शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सॲपद्वारे लग्नाचे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

जयनगर : कोरोना महामारीमुळे माणसाच्या जीवन शैलीत खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक रीतीरिवाज, प्रथा इत्यादी माणसाला ...

जयनगर : कोरोना महामारीमुळे माणसाच्या जीवन शैलीत खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक रीतीरिवाज, प्रथा इत्यादी माणसाला बदलावे लागले. कोरोना काळातील लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे लग्नकार्यातील पत्रिका छापण्याची प्रथा बंद झाली असून, व्हाॅट्सॲपद्वारे लोकांना लग्नाची निमंत्रणपत्रिका पाठवली जात आहे. त्यामुळे भविष्यात लग्नपत्रिका छापणे इतिहास जमा होणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना महामारीमुळे अनेक गोष्टी माणसाने स्वतःहून बंद अथवा परिस्थितीनुसार बदलल्या आहेत. पूर्वी ज्या घरी लग्नकार्य असायचे तेथे शेकडोंच्या संख्येने पत्रिका नातेवाइकांना व आप्तस्वकीयांना वाटण्यासाठी छापल्या जायच्या; परंतु आता सोशल मीडियाच्या जमान्यात लग्नपत्रिका छापणे मागे पडू लागले आहे. मागील १५ महिन्यांच्या कालावधीत घराघरात लग्नपत्रिका मिळणे मुश्कील झाले आहे. कोरोना महामारीच्या अगोदर प्रत्येक घरात लग्नपत्रिकांचा खच साचायचा. दरवर्षी कमीत कमी २० ते जास्तीत जास्त ४०-५० लग्नांच्या निमंत्रणपत्रिका प्रत्येक घरी हमखास येत असायच्या. ज्याठिकाणी लग्नकार्याला जायचे आहे, त्या पत्रिका तारखेनुसार प्रत्येकाच्या घरी लावल्या जात असत. ज्यांच्या घरी लग्नकार्य असायचे ते वेगवेगळ्या रंगांचे, डिझाइनचे पत्रिका छापण्यावर भर द्यायचे. तीन रुपयांपासून ते जास्तीत जास्त १००-२०० रुपयांपर्यंत एकच पत्रिका छापली जायची. पत्रिकाच्या डिझाइनवरून किंवा पत्रिकेतील मजकुरावरून परिवाराच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधला जायचा. मात्र, आता पत्रिका छापली जात नसल्यामुळे लग्नकार्यातील या खर्चालाही आळा बसण्यास मदत झाली आहे.

सद्य:स्थितीत सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रिका छापणे पूर्णतः बंद झाले असून, पूर्वीप्रमाणे पत्रिका वाटण्यासाठी मोटारसायकलीवर जाणारेही आता दिसत नाहीत. त्यामुळे आता लोकांचा आर्थिक खर्च तर वाचलाच आहे. परिणामी, वेळेचीही मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. तसेच प्रवासात-उन्हातान्हात पत्रिका वाटप करणाऱ्या सदस्यांनाही त्रास व्हायचा. आता मोबाइलवरच व्हॉट्‌सॲपद्वारे नातेवाइकांना निमंत्रणपत्रिका पाठविली जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता व्हाॅट्सॲपच्या पत्रिकेत भाऊबंदकीचे नाव घेतले जात नाही. त्यामुळे पूर्वी पत्रिका छापताना भाऊबंदकीचे एखादे नाव सुटले तर ते कुटुंब नाराज व्हायचे. बदलत्या काळात सोशल मीडियाद्वारे निमंत्रणाची ही पद्धत सोयीस्कर वाटत असली तरी पूर्वीप्रमाणे प्रत्येक नातेवाइकाच्या घरी जाऊन निमंत्रणपत्रिका देऊन लग्नाला बोलावल्यामुळे जे प्रेमाचे नाते व जिव्हाळा जोपासला जायचा तो आता दुरावत चालला आहे.