शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 11:48 IST

गेल्या आठवडय़ातील पावसाचा परिणाम : रब्बी हंगामाला होणार फायदा

ठळक मुद्दे विरचक प्रकल्पाला अद्यापही प्रतिक्षाच.. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात अद्यापही केवळ 40 टक्केच पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पाच्या आधी असलेले आंबेबारा आणि धनीबारा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यावरच शिवण नदीतून विरचक प्रकल्पात पाणी येत असते.

ऑनलाईन लोकमतनंदुरबार : गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. असे असले तरीही दहा लघु प्रकल्पांमध्ये 25 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. 12 प्रकल्प पुर्णपणे भरले असून एकुण  64.37 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे किमान रब्बी हंगामाला तरी त्याचा फायदा होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचा अनियमितपणा आहे. आधीच जून महिन्यात उशीराने पाऊस झाला. जुलै महिन्यातील सरासरी देखील पुर्ण झाली नाही. ऑगस्ट महिन्यात ब:यापैकी हजेरी लावल्याने पावसाची टक्केवारी वाढली. सध्या 77.63 टक्के सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण ब:यापैकी असून गेल्यावर्षाच्या तुलनेत पाच टक्के तूट मात्र कायम आहे.शहादा, नवापूर तालुके कोरडेयंदा देखील शहादा व नवापूर तालुक्यावर वरुणराजा मेहरबान नसल्याची स्थिती आहे. सर्वात कमी पजर्न्यमान शहादा तालुक्यात सरासरीचा अवघा 56.41 टक्के पाऊस झाला आहे. तर नवापूर तालुक्यात 66.70 टक्के पाऊस झाला आहे. याउलट सर्वाधिक पाऊस  हा धडगाव तालुक्यात 99.55 टक्के झाला आहे. धडगाव तालुका सरासरी भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. याशिवाय तळोदा तालुक्यात 83.99 तर नंदुरबार तालुक्यात 82.97 टक्के पाऊस झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यात 79.35 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टअखेर सरासरीचा 540.58 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा 647.67 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. परंतु असे असले तरी दोन तालुक्यांची सरासरी पाच टक्क्यांनी कमीच असल्याचे चित्र आजही कायम आहे.पाणीसाठा वाढलागेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात एकुण   37 लघु व चार मध्यम प्रकल्प   आहेत. याशिवाय सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजस असून त्या   माध्यमातून शेती सिंचनाची व्यवस्था केली जाते. सध्या लघु प्रकल्पांमध्ये 68.26 तर मध्यम प्रकल्पांमध्ये 62.73 टक्के पाणीसाठा आहे. एकुण दोन्ही प्रकल्प मिळून 64.37 टक्के पाणीसाठा झाला आहे.  त्यात रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. याशिवाय शहादा तालुक्यातील दरा प्रकल्प देखील पुर्णपणे भरला आहे. राणीपूर प्रकल्पात 60.67 टक्के पाणीसाठा आहे. विरचक प्रकल्पात 40.71 टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्वच प्रकल्पांमध्ये किमान पाच ते 20 टक्के पाणीसाठय़ाची वाढ गेल्या आठवडय़ाभरात झाली आहे. शहादा व नवापूर तालुक्यातील अनेक प्रकल्पांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. या दोन्ही तालुक्यातील आठपेक्षा अधीक  प्रकल्पात 25 टक्कपेक्षा कमी पाणीसाठा आहे. याउलट नंदुरबार, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे. सप्टेंबर महिन्यात नियमित पावसाळा आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातील परतीचा पाऊस यामुळे पावसाची टक्केवारी आणखी वाढून किमान प्रकल्पातील पाणीसाठय़ात देखील वाढ होण्याची शक्यता  आहेच.रब्बीला फायदाया पाणीसाठय़ाचा फायदा रब्बी पिकांना होतो. त्यामुळे शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या वर्षी सरासरी 76 टक्के पाणीसाठा झाला होता. जानेवारीअखेर या पाणीसाठय़ाचा उपयोग रब्बी पिकांसाठी केला जात असतो. मात्र, उन्हाळ्यात प्रकल्पांमध्ये ठणठणाट असतो.