शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 11:48 IST

गेल्या आठवडय़ातील पावसाचा परिणाम : रब्बी हंगामाला होणार फायदा

ठळक मुद्दे विरचक प्रकल्पाला अद्यापही प्रतिक्षाच.. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात अद्यापही केवळ 40 टक्केच पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पाच्या आधी असलेले आंबेबारा आणि धनीबारा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यावरच शिवण नदीतून विरचक प्रकल्पात पाणी येत असते.

ऑनलाईन लोकमतनंदुरबार : गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. असे असले तरीही दहा लघु प्रकल्पांमध्ये 25 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. 12 प्रकल्प पुर्णपणे भरले असून एकुण  64.37 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे किमान रब्बी हंगामाला तरी त्याचा फायदा होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचा अनियमितपणा आहे. आधीच जून महिन्यात उशीराने पाऊस झाला. जुलै महिन्यातील सरासरी देखील पुर्ण झाली नाही. ऑगस्ट महिन्यात ब:यापैकी हजेरी लावल्याने पावसाची टक्केवारी वाढली. सध्या 77.63 टक्के सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण ब:यापैकी असून गेल्यावर्षाच्या तुलनेत पाच टक्के तूट मात्र कायम आहे.शहादा, नवापूर तालुके कोरडेयंदा देखील शहादा व नवापूर तालुक्यावर वरुणराजा मेहरबान नसल्याची स्थिती आहे. सर्वात कमी पजर्न्यमान शहादा तालुक्यात सरासरीचा अवघा 56.41 टक्के पाऊस झाला आहे. तर नवापूर तालुक्यात 66.70 टक्के पाऊस झाला आहे. याउलट सर्वाधिक पाऊस  हा धडगाव तालुक्यात 99.55 टक्के झाला आहे. धडगाव तालुका सरासरी भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. याशिवाय तळोदा तालुक्यात 83.99 तर नंदुरबार तालुक्यात 82.97 टक्के पाऊस झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यात 79.35 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टअखेर सरासरीचा 540.58 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा 647.67 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. परंतु असे असले तरी दोन तालुक्यांची सरासरी पाच टक्क्यांनी कमीच असल्याचे चित्र आजही कायम आहे.पाणीसाठा वाढलागेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात एकुण   37 लघु व चार मध्यम प्रकल्प   आहेत. याशिवाय सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजस असून त्या   माध्यमातून शेती सिंचनाची व्यवस्था केली जाते. सध्या लघु प्रकल्पांमध्ये 68.26 तर मध्यम प्रकल्पांमध्ये 62.73 टक्के पाणीसाठा आहे. एकुण दोन्ही प्रकल्प मिळून 64.37 टक्के पाणीसाठा झाला आहे.  त्यात रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. याशिवाय शहादा तालुक्यातील दरा प्रकल्प देखील पुर्णपणे भरला आहे. राणीपूर प्रकल्पात 60.67 टक्के पाणीसाठा आहे. विरचक प्रकल्पात 40.71 टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्वच प्रकल्पांमध्ये किमान पाच ते 20 टक्के पाणीसाठय़ाची वाढ गेल्या आठवडय़ाभरात झाली आहे. शहादा व नवापूर तालुक्यातील अनेक प्रकल्पांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. या दोन्ही तालुक्यातील आठपेक्षा अधीक  प्रकल्पात 25 टक्कपेक्षा कमी पाणीसाठा आहे. याउलट नंदुरबार, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे. सप्टेंबर महिन्यात नियमित पावसाळा आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातील परतीचा पाऊस यामुळे पावसाची टक्केवारी आणखी वाढून किमान प्रकल्पातील पाणीसाठय़ात देखील वाढ होण्याची शक्यता  आहेच.रब्बीला फायदाया पाणीसाठय़ाचा फायदा रब्बी पिकांना होतो. त्यामुळे शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या वर्षी सरासरी 76 टक्के पाणीसाठा झाला होता. जानेवारीअखेर या पाणीसाठय़ाचा उपयोग रब्बी पिकांसाठी केला जात असतो. मात्र, उन्हाळ्यात प्रकल्पांमध्ये ठणठणाट असतो.