शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
4
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
5
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
6
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
7
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
8
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
9
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
10
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
11
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
12
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
13
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
14
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
15
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
16
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
17
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
18
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
19
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
20
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

वरखेडीचा पुल ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:19 PM

अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्ग : पुलाच्या स्ट्ररल ऑडीटची मागणी

वाण्याविहीर : अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावरील अक्कलकुवा ते सोरापाडापासूनजवळच असलेल्या वरखेडी नदीवरील पुल जीवघेणा ठरू पाहात आहे. पहिल्याच पावसात वरखेडी येथील नदी पुलावर जीवघेणे खड्डे पडल्याने पुलाची दयनिय अवस्था झाली आहे. या महार्गावर वाहनाची नेहमीच वर्दळ असते.रस्त्यात खड्डे की, खड्डयात रस्ता हेच वाहनचालकांना समजत नसल्याने खड्डे टाळण्याच्या प्रय}ात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाने गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश असे तीन राज्य जोडले गेले आहेत. गुजरात राज्यातून अवजड सामग्री महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शहरांमध्ये जात असल्याने अवजड वाहने रात्रंदिवस ये-जा करीत असतात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा  अधीक  क्षमतेची वाहने या महार्गावरून जात असल्याने रस्ता लवकर खराब होतो. तसेच वरखेडी नदीवरील पुलाची दिवसेंदिवस  दुरवस्था होत असून, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात येत नाही. यासाठी लवकरात लवकर अंकलेश्वर-ब:हाणपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. बारडोली, व्यारा, सोनगड व नवापूरकडून मध्यप्रदेशात जाणारी सर्व वाहने या मार्गाने जात असल्याने या मार्गावर नियमित वाहतुकीचा खोळंबा होतो. सध्या हा राज्य मार्ग असल्याने या मार्गाची वाहतूक क्षमता नऊ ते 15 टन वजन वाहून नेण्याची आहे. मात्र या मार्गावरून 25 टनांची अवजड वाहने जात असल्याने सातत्याने हा मार्ग खराब होतो. या मार्गावरील वाहतूक ही राष्ट्रीय महामार्गाच्या बरोबरीची असल्याने सद्य:स्थितीतील रस्ता हा कमी पडत असल्याने या मार्गाचे लवकरात लवकर चौपदरीकरण करण्यात यावे जेणेकरून सर्व समस्या सुटू शकतील. त्यामुळे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून वरखेडी नदीपुलाची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.