शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरक कंपनीच्या विविध कामांसाठी निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागा बरोबरच शहरातील विजेच्या वेगवेगळ्या कामांसाठी वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार व शहादा उपविभागांनी जिल्हा विकास नियोजन ...

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागा बरोबरच शहरातील विजेच्या वेगवेगळ्या कामांसाठी वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार व शहादा उपविभागांनी जिल्हा विकास नियोजन समिती अर्थात डीपीडीसीतून आदिवासी उपाययोजना अंतर्गत साधारण ११ कोटी २२ लाख रूपयांच्या निधीचा प्रस्ताव यंदा दाखल केला होता. त्यास प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यातच प्रशासकीय पातळीवर मंजुरी देखील दिली आहे. तथापि प्रत्यक्षात अजून पावेतो संबंधित यंत्रणेला तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. परिणामी पावसाळा पूर्वीची कामे सुध्दा रखडली आहेत. वास्तविक चार महिन्यापूर्वीच जिल्हा नियोजन समितीने निधीस प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यामुळे निधीही लगेच देण्याची अपेक्षा होती. तसे झाले नाही. विशेषता या दोन्ही उपविभागांनी ग्रामीण व शहरी भागातील नवीन रोहित्रांवर अधिक भर दिला आहे. कारण पुरेशा रोहित्रांअभावी त्यांचावर जास्तीचा भार असल्यामुळे शेतकऱ्यांना खंडित वीज पुरवठ्याचा सतत सामना करावा लागत असतो. कारण रोहित्र जळाले तर १०-१२ दिवसांपर्यंत मिळत नाही. अक्षरश: वेटींग करावी लागत असते.

नवीन रोहित्रासाठी यंत्रणेकडे हेलपाटे मारावे लागत असतात. या शिवाय अनेक आदिवासी गावांमधील आदिवासी वस्त्यांमध्ये नवीन रोहीत्रे प्रस्तावित केली आहे. विशेषत: या आराखड्यात जीर्ण तारा, उच्च दाब व कमी दाबाच्या वाहिण्यावरील तारा बदलण्यासाठीदेखील निधीची तरतूद केली आहे. साहजिकच पावसाळ्या पूर्वी ही कामे करण्याची अत्यंत आवश्यकता होती. नेमके निधीच उपलब्ध न झाल्यामुळे पावसाळा जवळ येवून ही करता आली नाही. आजही सातपुड्यातील दुर्गम भागातील अनेक पाड्यांमध्ये वीज नाही. तेथील नागरिकांची सातत्याने वीजसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे सुरू आहे. मात्र तरीही त्यांना वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला नाही. जिल्हा प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आदिवासी जनतेची मागणी आहे.

कनेक्शन अभावी शेतकऱ्यांचे कृषी पंप धूळखात

नंदुरबार व शहादा विभाग जिल्हा नियोजन समितीत निधीसाठी दाखल केलेल्या आराखड्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी लागणाऱ्या विद्युत पोल व तारांची मागणी केली आहे. यात जिल्ह्यातील ११४ आदिवासी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या नवीन वीज जोडणीचा समावेश आहे. या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन अभावी पंपही अक्षरशा धूळखात पडून आहेत. जोडणी करीता शेतकरी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. जोडणीसाठी शेतकऱ्यांनी पाच-सहा महिन्यांपासून पैसे भरले आहेत, असे असताना अजूनही त्यांना केवळ विद्युत पोल अभावी कनेक्शन मिळत नसल्याची व्यथा या शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. वास्तविक वीज वितरण विभागाने जी कामे घेतली आहेत. ती सर्व आदिवासी उपयोजना योजनेखाली घेतली आहेत, असे असूनही निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेचा गंभीर प्रश्न लक्षात घेवून तातडीने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.

जिल्हा विकास नियोजन समितीकडे दाखल करण्यात आलेल्या शहादा उपविभागाच्या कामांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतु निधी अजून उपलब्ध नाही. आल्यावर तातडीने कामांची कार्यवाही करण्यात येईल. - अजय तायडे, सहायक अभियंता, उपविभाग शहादा.