शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

प्रकाशा गावाची लोकसंख्या जास्त आहे. यामध्ये ४५ वयाचा वरती तीन हजार ३१ लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावयाचे आहे. त्यापैकी ...

प्रकाशा गावाची लोकसंख्या जास्त आहे. यामध्ये ४५ वयाचा वरती तीन हजार ३१ लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावयाचे आहे. त्यापैकी पहिला डोस १३२० लोकांनी घेतला, असून, दुसरा डोस ३९६ लोकांनी घेतला आहे. म्हणजेच ४३.७४ टक्के लसीकरण झालेले आहे. लसीकरण वाढविण्यासंदर्भात केंद्रप्रमुख, प्राथमिक शाळेचे शिक्षक, माध्यमिक शाळेचे शिक्षक, आरोग्यसेवक, आशा वर्कर, ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी, तथा महसूल विभाग यांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत प्रकाशा गावात एक शिबिर झाले असून, प्राथमिक आरोग्य केंद्राची १४ शिबिरे झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बावस्कर यांनी दिली.

१ जून रोजी दगडी शाळा प्रकाशा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच सुदाम ठाकरे यांनी केले. दिवसभरात ४३ लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यासाठी आरोग्य विभागाचे सोनार, एस. डी. आगळे, आरोग्यसेविका संगीता पाटील, विद्या चौधरी, करुणा खैरनार, गटप्रवर्तक ममता पाटील, आशा वर्कर सविता पाटील, अलका चौधरी, सारिका बारीकराव, लिलाबाई पिंपळे यांच्यासोबत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामलाल पारधी, रवींद्र पाटील, ए. के. पाटील, भटू सामुद्रे, दर्पण भामरे, महेंद्र शिंपी, नरेंद्र गुरव, मनोज पाटील, आदी शिक्षकांनी या शिबिराप्रसंगी जनजागृती करीत लसीकरणासाठी लोकांना आणले.

लोकप्रतिनिधींकडून जनजागृती आवश्यक

प्रकाशा परिसरामध्ये गेल्या एक ते दीड महिन्यापासून आरोग्यसेवक, आशा वर्कर, शिक्षक, ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, आदी, सर्व जनजागृती करीत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे यासाठी जनजागृती करण्यात येत असून, गावातील लोकांना आरोग्य केंद्रावर जाणे लांब पडते म्हणून दगडी शाळेमध्ये शिबिराचे आयोजन केले होते.

शिबिराचे आयोजन जर गावाच्या इतर गल्लीत केलं तर नक्कीच संख्या वाढेल यात दुमत नाही. मात्र, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनीदेखील गावांमध्ये विविध उपक्रम राबवीत लसीकरणासाठी जोर धरला पाहिजे असे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे. कारण काही गट अजूनही लसीकरणापासून लांब आहेत. त्यांच्या जनजागृती होणे गरजेचे आहे.

सुज्ञ नागरिक प्रकाशा

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र, ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांना एवढ्या लांब जाणं परवडत नाही म्हणून दररोज गावातील प्रत्येक गल्लीमध्ये एक-एक शिबिर लावण्यात यावे जेणेकरून यांची संख्या वाढेल.

शिबिराचे आयोजन गावातील सर्वच गल्लीमध्ये एक दिवस व्हावे. जेणेकरून लोकांना ते सुलभ होईल.