शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

निवेदनात म्हटले आहे की, आजपर्यंत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. २६ ...

निवेदनात म्हटले आहे की, आजपर्यंत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. २६ मार्चच्या आदेशात १ ते १५ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व आस्थापना (दुकाने) बंद ठेवण्याचा निर्णय केला आहे . मे, जून २०२० पासून लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता देण्यात आली. व्यापार, व्यवसाय, उद्योग पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. परंतु अनेक भागात काही निर्बंध लागू होतेच. त्यामुळे अनेक व्यवसाय अडचणीत आहेत. जसे हॉटेल, केटरींग, मंडप, मॅरेज लॉन/हॉल, कापड, भांडी, बांधकाम, सोने-चांदी, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी लहान-मोठे व्यवसाय आजही अडचणीत आहेत. व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक, त्यासाठी घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज, जागेचे भाडे, कर्मचारी वर्गाचे पगार, अनेक व्यवसायात परप्रांतीय कामगार कामावर आहेत. त्यांचा मोठा प्रश्न लॉकडाऊन काळात उभा राहतो. अशा अनेक प्रकारच्या दुकानाचे, व्यवसायाचे अनेक लहान-मोठ्या अडचणींमुळे संपूर्ण व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. आता परत १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक व लहान-मोठे हातगाडीवरील व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. कोरोना या साथीच्या रोगास प्रतिबंध करण्यास आम्हीही बांधील आहोत. परंतु यासाठी आता लॉकडाऊन हा पर्याय नाही. यासाठी आपण २६ मार्चला दिलेल्या आदेशात बदल करुन सर्व प्रकारच्या आस्थापना या सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात व आठवड्यातून एकदा जनता कर्फ्यू जाहीर करावा. तसेच हॉटेल व खानावळी यांनाही वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून मिळावी व रात्रीची संचारबंदी कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करीत असल्याचे नमूद केले आहे. आम्ही आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ग्राहकांना मास्क लावणे बंधनकारक करू तसेच सॅनिटायझरची व्यवस्था व सोशल डिस्टन्सिंग आदी व आपण दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करु. आमच्या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा व व्यापार वाचवावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल शर्मा, कल्पेश पटेल, मनोज जैन, रमाशंकर माळी, रमेश जैन, गौरव जैन आदींसह व्यापारी बांधवांच्या सह्या आहेत.