घर बांधकामाच्या वादातून शिक्षक युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:24 IST2020-06-25T12:24:51+5:302020-06-25T12:24:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : घर बांधकामाच्या वेळी शेजारच्या लोकांनी त्रास दिल्याने शिक्षक युवकाने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची ...

घर बांधकामाच्या वादातून शिक्षक युवकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : घर बांधकामाच्या वेळी शेजारच्या लोकांनी त्रास दिल्याने शिक्षक युवकाने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कसरावद (मध्यप्रदेश) येथे २१ जून रोजी घडली. याप्रकरणी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमुद केलेल्या सात जणांविरुद्ध निसरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास पंडित पाटील (३२) रा.भातकी, ता.पानसेमल असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तर निंबा दगा महाले, वंदना निंबा महाले, रीता निंबा महाले, भिका सरदार महाले, सकु भिका महाले, विवेक भिका महाले, गोलू निंबा महाले असे संशयीतांचे नावे आहेत. कैलास पाटील त्यांनी २१ जून रोजी छोटी कसरावद येथील नर्मदा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. पाटील हे त्यांच्या भातकी गावी घराचे बांधकाम करीत होते. तेथे त्यांना शेजारी राहणारे महाले परिवार त्रास देत होता.
मध्यंतरी सरपंच व सचिव यांच्या मध्यस्थीने वादावर पडदाही टाकण्याचा प्रयत्न झाला. नंतर वाद घालणाऱ्यांनी पत्नीलाही मारहाण केली. पोलिसांनी पत्नीचा जबाबही घेतला नाही. या सर्व बाबीला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत.
दोषींना कडक शिक्षा करावी, परिवाने मला माफ करावे असेही त्यात नमुद करण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी भाऊ भुपेंद्र पाटील यांना याबाबत फोन करून माहिती दिली होती. धार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाखनसिंह बघेल यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.