शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

तळोदा तालुका : 618 तीव्र कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:47 PM

तळोदा तालुका : आरोग्य व महिला बालकल्याण विभागाची शोधमोहीम

वसंत मराठे । 

तळोदा : आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत गेल्या महिन्यात कुपोषित बालके शोधण्यासाठी तालुक्यात विशेष मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेत तीव्र कुपोषित 618 बालके आढळून आली आहेत.गुजरातमधून स्थलांतरीत झालेले कुटुंबे पुन्हा गावात परतल्यामुळे या बालकांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे संबंधीत यंत्रणेचे म्हणणे असले तरी अंगणवाडय़ांमध्ये पुरविला जाणारा सकस आहाराबाबतही प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. प्रशासनाने आता या बालकांची कुपोषित श्रेणी उंचावण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आदेशाने तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम तालुक्यामध्ये कुपोषित बालके शोधून काढण्यासाठी 17 ते 31 मे 2018 या दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली होती. तळोदा तालुक्यातही पंचायत समितीच्या आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने या बालकांचे सव्रेक्षण करण्यात आले होते. यासाठी एकूण 18 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, नर्स व अंगणवाडी सुपरवायझर यांचा समावेश होता. याशिवाय या पथकामध्ये बाहेरच्या पंचायत समितीच्या व आरोग्य विभागाचे कर्मचारीही घेण्यात आली होती. या पथकांनी तळोदा तालुक्यातील 105 गावांमधील 242 अंगणवाडय़ातील साधारण 13 हजार 330 बालकांची प्रत्यक्ष अंगणवाडय़ांमध्ये जावून तपासणी केली. 618 शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात आली. या विशेष तपासणीत 618 बालके तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. या मोहिमेआधी संपूर्ण तालुक्यात केवळ 87 बालके तीव्र कुपोषित स्वरूपाची होती. मात्र आता नवीन विशेष मोहिमेत हा आकडा प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. गुजरातमध्ये रोजगारासाठी स्थलांतर झालेली कुटुंबे पुन्हा गावाकडे परतली आहे. त्यामुळे सकस आहाराअभावी बालकांचे प्रमाण वाढल्याचे संबंधीत यंत्रणेचे म्हणणे आहे. तथापिही कुटुंबे यंदा तीन ते चारच महिने वास्तव्यास असल्याचे म्हटले जाते. कुपोषणाची श्रेणी दोन-चार महिन्यात कमी होणार नाही त्यामुळे यंत्रणेच्या दाव्यावर शंका उपस्थित केली जाते.साहजिकच अंगणवाडय़ामधील सकल आहाराबाबत किती प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वास्तविक शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडय़ातून अंडी, केळी, बंद पाकीट आहार अशा सकस आहार व ग्रामबालविकास केंद्रावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत, असे असतांना कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे या विशेष मोहिमे वरून दिसून येते. कुपोषित बालकांसाठी विशेष मोहिम राबविण्याचा जिल्हा परिषदेचा चांगला निर्णय असला तरी आता या बालकांची श्रेणी वाढविण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाय योजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.कुपोषित बालकांसाठी शासनाने अंगणवाडय़ांमध्ये ग्राम बालविकास केंद्रे सुरू केली आहेत. सर्वच अंगणवाडय़ात ही केंद्रे चालू केलेली आहेत. या केंद्रांमध्ये गावातील कुपोषित बालकांनादाखल करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचाराबरोबरच सकस आहार दिला जातो. प्रत्येक बालकावर साधारण शासन एक हजार 300 रुपये अंगणवाडीस अनुदान देत असते. महिनाभरात एवढा खर्च संबंधित बालकावर खर्च केला जात असतो. साहजिकच कुपोषणाचे प्रमाणदेखील कमी झाले पाहिजे. मात्र ते सातत्याने वाढत असल्याचे विदारक चित्र आहे. केवळ प्रभावी अंमलबजावणीअभावी कुपोषणाचे प्रमाण वाटत असल्याचे म्हटले जात आहे. प्रशासनास खरोखरच यावर मात करावयाची असेल तर अंगणवाडय़ावरील भरारी पथकांचा वॉच ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण जिल्ह्यातील प्रत्येक वरिष्ठ जबाबदार अधिका:यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याचेही सुयोग्य नियोजन केले पाहिजे. प्रत्यक्षात ग्राम बालक विकास केंद्रे कागदावरच चालत असल्याचाही आरोप आहे. या शिवाय यासाठी मनुष्यबळदेखील वाढविण्याची आवश्यकता आहे. निदान यामुळे तरी अशा बालकांना सकस आहाराचा फायदा होईल. अन्यथा शासनाने असे करोडो रुपये खर्च केले तरी त्याचा उपयोग कुपोषण मिटण्यास होणार नाही.