शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नंदुरबारातील धोकेदायक घाटमार्गाचे सव्रेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:52 IST

‘आंबेनळी’ दुर्घटनेची पाश्र्वभूमी : शासनाकडे पाठविणार एकत्रित अहवाल

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील विविध धोकेदायक घाटमार्गाचे सव्रेक्षण करुन त्याची एकत्रित माहिती शासनाकडे पाठविण्यात येणार आह़े नंदुरबार, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचा:यांकडून बुधवारी त्या-त्या कार्यक्षेत्रातील धोकेदायक घाटांचे पायी चालत सव्रेक्षण करण्यात आल़े 28 जुलै रोजी पोलादपूर  तालुक्यातील आंबेनळी घाटात दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचा:यांची बस कोसळून दुर्घटना झाली होती़ ही घटना ताजी असताना  सार्वजनिक बांधकाम मंत्रालय खळबडून जागे झाले आह़े त्यामुळे शासनाकडून धोकेदायक ठरत असलेल्या घाटमार्गाची सध्याची स्थिती, त्यावर करण्यात येऊ शकणा:या उपाय योजना आदींबाबतचा अहवाल खात्याकडून मागविण्यात आला आह़े त्यानुसार नंदुरबार, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आपआपल्या कार्यक्षेत्रातील धोकेदायक घाटांचे सव्रेक्षण करुन माहिती गोळा करण्यात येत आह़े  नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता पी़ज़े वळवी, शाखा अभियंता ए़ज़े वळवी तसेच इतर कर्मचा:यांकडून तळोदा तालुक्यातील चांदसैली घाटाची पाहणी करण्यात आली आह़े या घाटावर कुठल्याही प्रकारचे सुरक्षा कठडे नाहीत़ त्यामुळे याबाबत कठडय़ांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती  उपअभियंता पी़ज़े वळवी यांच्याकडून देण्यात आलेली आह़े शहादा, अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आदी विभाग शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असून नंदुरबार व तळोदा विभाग नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत आहेत़ सर्वाधिक धोकेदायक घाटमार्ग हे शहादा विभागांतर्गत मोडत असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कमलाकर साळुंखे, शाखा अभियंता प्रवीण साळुंखे, अभियांत्रिकी सहाय्यक यशवंत ठाकरे आदी अधिकारी व कर्मचा:यांनी बुधवारी पायी चालत शहादा विभागांतर्गत मोडल्या जाणा:या घाट मार्गाची पाहणी केली आह़े याचा सर्वाचा एकत्रित अहवाल हा शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर उपाय योजनांबाबत कार्यवाही होणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आह़े  जिल्ह्यातील रोषमाळ-धडगाव व कोठार-तळोदा घाटमार्ग तसेच महामार्ग क्रमांक तीनवरील मोलगी-डाब-अक्कलकुवा हे चार घाटमार्ग अत्यंत धोकेदायक असल्याचा अहवाल या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आह़े त्यामुळे संबंधित मार्गाची पाहणी करून त्या ठिकाणी सर्व उपाय योजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़ेसातपायरी घाट धोकेदायकराज्यभरातील पर्यटक शहादा येथील तोरणमाळ या पर्यटनस्थळी दाखल होत असतात़ तोरणमाळला जाण्यासाठी सातपायरी घाटाला ओलांडून जावे लागत असत़े हा घाट अत्यंत धोकेदायक असून टप्प्या-टप्प्यानी येणा:या वळणांमुळे येथून जात असताना अक्षरश जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत असतो़ या घाटाला संरक्षक कठडेसुध्दा नाहीत़ ‘आंबेनळी’ सारखी एखादी दुदैवी दुर्घटना घडण्यास या ठिकाणीसुध्दा वाव निर्माण होऊ शकतो़ सध्या पावसाळी दिवस असल्याने पर्यटकांकडून तोरणमाळला जाण्यास अधिक पसंती देण्यात येत असत़े घाटांवर होणारे भूस्खलन हेसुध्दा अपघातास मोठे कारण ठरत़े त्यामुळे घाटमार्गावरील भूस्खलन रोखण्यासाठी गॅबियन पध्दतीचा वापर उपयुक्त ठरु शकतो़ या पध्दतीमध्ये घाटाच्या पायथ्यालगत चौकोनाकृती बॉक्स ठेवण्यात येत असतात़ त्यात दगडे ठेवली जातात़ पावसाचे पाणी आल्यास ते घाटाच्या लगत ठेवलेल्या गॅबियन बॉक्समधून वाहत जातात़