शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

चिनी वस्तू वापरावर नागरिकांकडून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 9:20 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : चीनच्या सूडबुद्धीला आव्हान देण्याच्या निमित्ताने बऱ्याच नागरिकांकडून चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यानिमित्ताने ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : चीनच्या सूडबुद्धीला आव्हान देण्याच्या निमित्ताने बऱ्याच नागरिकांकडून चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यानिमित्ताने कानुबाई, दशामाता गणेशोत्सवासाठी बाजारात विक्रीस आलेल्या चिनी वस्तूंच्या मागणीत सुमारे १५ टक्क्यांनी मागणी घटल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.सण-उत्सव म्हटला की नागरिकांकडून आकर्षक आरास, देखावा तयार करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी विशेषत: चिनी वस्तूंचा अधिक वापर करण्यात येतो. या वेळी सजावटीसाठी लागणारे कमल फूल, झाड, मेटल बल्ब, लहान-मोठी लायटींग, स्पॉटलाईट, एलईडी स्ट्रीप, लेझर लाईट, नारळ, एलईडी पार लाईट, ड्रॉप लाईट अशा विविध प्रकारच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपासून चीनकडून देण्यात येत असलेल्या धमक्यांमुळे देशवासीयांनी चिनी वस्तूंच्या वापरावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा चिनी वस्तूंच्या विक्री व वापरावर परिणाम झाला आहे.राख्यांमध्ये ‘मेड इन इंडिया’चाबोलबालायावर्षी कोरोनामुळे राखी बाजारावर परिणाम झाला आहे. दरवर्षी एक महिन्यापूर्वीच राख्यांची बाजारपेठ सजत होती. पण यावर्षी पाच ते सहा दिवसापूर्वी ग्रामीण भागातील बाजारात राख्यांची दुकाने पहायला मिळाली. चिनी राख्यांच्या किमतीच्या तुलनेत यावर्षी भारतीय राख्या २० टक्के महाग झाल्या. १५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत किंमत होती. प्रत्येक राखीची कलाकुसर आकर्षक असल्याने प्रत्येकाचे मन मोहून घेतले. मुलांसाठी कार्टून कॅरेक्टरच्या अनेक राख्या उपलब्ध होत्या. त्यात डोरेमॅन, छोटा भीम आणि लायटिंगच्या राख्यांचा समावेश होता.बाजारात जुन्या चिनी राख्यांची विक्रीशहादा शहरातील व्यापारी म्हणाले की, ज्या व्यापाऱ्यांकडे गेल्यावर्षीच्या जुन्या चिनी राख्यांचा साठा आहे , ते त्या राख्यांची विक्री करीत आहेत. यंदा चिनी राख्या कोणत्याही ठोक व्यापाºयांनी मागविल्या नाहीत. बाजारातही भारतीय बनावटीच्या राख्यांना मागणी होती. सध्या २५ टक्केही व्यवसाय झालेला नाही. जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी संभ्रमात आहेत.काही नागरिकांकडूनचिनी वस्तू खरेदीसध्या कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये सण-उत्सवाला सुरुवात झाली आहे. काही नागरिक आर्थिक बाजू कुमकुवत जरी झाली आहे तरी सण-उत्सव साजरे करण्यावर भर देत आहेत. सजावटीसाठी लागणारे चिनी वस्तू स्वस्त दरात मिळत असल्याने चिनी वस्तू खरेदीकडे गोरगरीब जनतेचा काही प्रमाणात कल लागला आहे.