शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Vidhan Sabha 2019: भाजपच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची अस्तित्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:51 AM

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भाजपची बंडखोरी, शिवसेनेची अस्तित्वाची लढाई आणि काँग्रेसचा प्रतिष्ठेचा मुद्दा अशा वर्चस्वाच्या ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भाजपची बंडखोरी, शिवसेनेची अस्तित्वाची लढाई आणि काँग्रेसचा प्रतिष्ठेचा मुद्दा अशा वर्चस्वाच्या ट्रँगलमध्ये अक्कलकुवा मतदारसंघाची लढत अडकली आहे. मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या लढाईत काँग्रेस उमेदवार अॅड.के.सी.पाडवी आठव्यांदा विजयी होतात की शिवसेनेचे आमशा पाडवी यांचे नशीब उजाडते याकडे लक्ष लागून आहे.  राज्यातील पहिला मतदारसंघ म्हणून अक्कलकुवा मतदारसंघाला ओळखले जाते. या पहिल्याच मतदारसंघातून विजयाची सुरुवात व्हावी यासाठी शिवसेनेने अस्तित्वाची लढाई लढण्यास सुरुवात केली आहे तर काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी बंडखोरी करीत येथे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या बंडखोरीचा फटका काँग्रेसलाही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघातून अर्थात पूर्वीच्या धडगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी.पाडवी हे अपक्ष, जनता दल आणि काँग्रेस यांच्याकडून सतत सात वेळा निवडून आले आहेत. 2009 पासून पुनर्रचनेत हा मतदारसंघ अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांचा होऊन अक्कलकुवा म्हणून ओळखला जावू लागला. नवीन मतदारसंघातही के.सी.पाडवी निवडून येत आहे. यंदा आठव्यांदा ते निवडणूक लढवीत आहेत. युतीअंतर्गत शिवसेनेच्याच वाटय़ाला असलेला हा मतदारसंघ यंदा अपेक्षेप्रमाणे शिवसेनेला सुटला आहे. गेल्या वेळी शिवसेनेकडून लढलेले पक्षाचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी हेच यावेळीही उमेदवारी करीत   आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची धडगाव येथे जाहीर सभा देखील झाली. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमशा पाडवी यांना रघुवंशी यांची चांगली मदत मिळू लागली आहे. पूर्वीचे राष्ट्रवादीचे विजयसिंग पराडके, किरसिंग वसावे यांचीही साथ मिळत आहे. दुसरे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे हे देखील मेहनत घेत आहेत. युतीअंतर्गत सर्व आलबेल असतांना या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे सहाजिकच या ठिकाणी सरळ होणारी लढत आता तिरंगी होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. नागेश पाडवी यांनी गेल्या पाच वर्षापासून मतदारसंघात संपर्क सुरू ठेवला होता. शिवसेनेने शहाद्यात प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बंडखोरीबाबत तक्रार झाल्याने नागेश पाडवी यांच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले  आहेत. 

काँग्रेसच्या प्रचाराचे मुद्दे

जास्तीत जास्त गाव, पाडय़ांर्पयत रस्ते करून दळणवळणाची सोय उपलब्ध करून दिल्याचा दावा.दुर्गम भागातील गाव, पाडय़ांर्पयत वीज पोहचविली. 71 वन गावांचा प्रश्न सोडविल्याने ही गावे आता महसूली झाल्याने मुख्य प्रवाहात आल्याचा मुद्दा.अनेक ठिकाणी आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना पक्की इमारत बांधून देत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.अक्कलकुवा शहर आणि धडगाव शहर विकासासाठी वेळोवेळी निधी आणून दिल्याचा दावा.

शिवसेना युतीच्या प्रचाराचे मुद्दे 

वर्षानुवर्षे अनेक गावे, पाडे रस्ते, पाणी, विजेच्या सोयींपासून दूर.आंबा, सिताफळ, महू या पासून प्रक्रिया उद्योगाच्या वेळोवेळी घोषणा परंतु काहीही हालचाल नाही.पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्याला कारण दळणवळणाच्या अपु:या सोयी-सुविधा.नर्मदा काठावरील अनेक गावांना सुविधांचा अभाव. डूब क्षेत्रातील गावे व परिवार आजही वा:यावरच.मतदारसंघात नियमित संपर्काचा अभाव.

लढतीतील सहा उमेदवार व त्यांचे पक्ष अॅड.के.सी.पाडवी (काँग्रेस), आमशा फुलजी पाडवी (शिवसेना), नागेश दिलवरसिंग पाडवी (अपक्ष), कैलास वसावे (आम आदमी पार्टी), संजय वळवी (भारतीय ट्रायबल पार्टी), करमसिंग वळवी (अपक्ष)