शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला होता. त्यात १५० च्या आसपास लोकांना कोरोना संसर्ग झाला ...

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला होता. त्यात १५० च्या आसपास लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यात काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु स्थानिक प्रशासनाने सूक्ष्म नियोजन आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमाने व स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे सारंगखेडा हे आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे. आता स्थानिक विलगीकरण कक्षात फक्त दोन कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत.

७४ लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

येथील ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य विभागाकडून नुकतीच ७४ लोकांची अँटिजन कोरोना चाचणी केली असता, सर्वच लोकांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांत वेळोवेळी स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाकडून वेळोवेळी सर्वेक्षण, घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी, जनजागृती, संशयित रुग्णांना आयसोलेशन न करता ग्रामपंचायत विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार करणे, व्यापारी बांधवांनीही शासकीय नियमांचे पालन करत आपला व्यवसाय करणे, या सर्व गोष्टी कोरोना रोखण्यासाठी फलदायी ठरल्याने आज तापी पट्ट्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या सारंगखेडा गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतिलाल पावरा, डॉ. किशोर पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी. एम. पाटील, औषध निर्माण अधिकारी एम. बी. परदेशी, आरोग्य सहायक आर. आर. महिरे, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी संतोष डिगराळे, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले. सर्व परिस्थितीवर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ लक्ष ठेवून होते.

ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाच्या उपायोजना

ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाला सहकार्य करत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. ग्रामपंचायतीने वेळोवेळी निर्जंतुकीकरण, औषध फवारणी करण्यात आली. तसेच जनजागृती, कोरोना चाचणी, जनता कर्फ्यू, शासकीय नियमांचे पालन, ग्राहकांनी शासनाने दिलेल्या वेळेत खरेदी करून, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदींसह उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यानेच प्रशासनाकडून सांगण्यात येते.

कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करायचे असेल, तर प्रत्येक नागरिकांनी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, हा एकमेव उपाय आहे आणि १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साधले पाहिजे. लस पूर्णतः सुरक्षित असून, नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये.

- जयपालसिंह रावल, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद