शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कृषिपंपधारकांकडे २९५ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 8:03 PM

शहादा विभाग : २७ हजार कृषिपंपधारक, वर्षागणिक वाढतेय थकबाकीची रक्कम

बोरद : शहादा उपविभागांतर्गत येणाऱ्या तळोदा, शहादा, अक्कलकुवा व धडगाव या चार तालुक्यांमध्ये कृषिधारकांकडे तब्बल २९५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उघड झाली आहे़ गेल्या अनेक वर्षांच्या या थकबाकीत केवळ वाढच होत असल्याने या थकबाकीचे करायचे काय? असा प्रश्न महावितरण व शेतकऱ्यांना भेडसावत आहे़जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने कृषिपंपधारकांकडून कृषिपंपाच्या बिलाची वसुली करण्यासाठी शासनाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे़ तुर्तास या थकबाकीला थांबवले असले तरी, कृषिपंपाचे थकीत बिल माफ करण्याबाबत शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये़ त्यामुळे साहजिकच डोक्यावर ऐवढीमोठी थकबाकी असल्याने कृषिपंपधारकांकडून चिंता व्यक्त होत आहे़ सध्या थकबाकी वसुली होत नसली तरी पुढील पावसाळा चांगला झाल्यास तसेच निवडणुका आटोपल्यास थकबाकीचे भुत पुन्हा कृषिपंपधारकांच्या मानगुटीवर बसणार की काय? असा प्रश्न या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे़ त्यामुळे शासनाने थकबाकी माफ करावी अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे़दरम्यान, शहादा तालुक्यात २२० कोटी, तळोदा तालुक्यात ४९ कोटी, अक्कलकुवा तालुक्यात २२ कोटी तर धडगाव तालुक्यात ४ कोटी असे चारही तालुके मिळून २६ हजार ७५० कृषिपंपधारकांकडे २९५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या शहादा उपविभागाकडून देण्यात आलेली आहे़दरम्यान, यंदा जिल्ह्यात केवळ ६७ टक्के इतक्या पावसाची नोंद झालेली होती़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती ओढावली आहे़ पावसाचे पाणी जमिनीत मुरलेच नसल्याने साहजिकच दिवसेंदिवस भूजल पातळी खालावत आह़े़ जिल्ह्यातील विविध जलस्त्रोत आटून गेले आहेत़ लघुप्रकल्प, विहिरी, गाव तलाव आदींमध्ये नावालासुध्दा पाणी राहिलेले नाही़ शेतकºयांच्या कुपनलिकाही पूर्णपणे आटल्या आहेत़ जिल्ह्यात भयंकर दुष्काळी स्थिती असल्याने साहजिकच अनेक शेतकºयांचे कृषिपंपही अनेक महिन्यांपासून बंद असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे़सौर उर्जेवरील कृषिपंप सुरु करावेअनेक जिल्ह्यांमध्ये सौर उर्जेवर कृषिपंप सुरु करण्यात आलेले आहे़ यामुळे वीजदेखील वाचत असून शेतकºयांवर वीजबिलाचा बोजाही कमी होत असतो़ त्यामुळे स्थानिक ठिकाणीही सौर उर्जेवर चालणारे कृषिपंप बसविण्यात यावे अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे़ यासाठी शहादा उपविभागातील चारही तालुक्यातील एकूण १ हजार ७०० कृषिपंपधारकांनी अर्ज केले असल्याची माहिती मिळाली़ सौरउर्जेवर चालणाºया कृषिपंपाना हरकत नाही परंतु विघ्नसंतोषी लोकांकडून सौर पंपाच्या प्लेटा फोडणे, साहित्यांची चोरी करणे आदी घटना होण्याची भिती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे़दरम्यान, ‘एक डिपी एक पोल’ याअंतर्गत आलेल्या अर्जांपैकी सुमारे १ हजार १०० शेतकºयांचे अर्ज मंजुर करण्यात आले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आलेली आहे़ याबाबत लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे़