शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सी-लेजची कामे पाहून संशोधक पथक समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘विज्ञान तंत्रज्ञान आधाराने परिसरात समृद्धि आणणे’ या व्यापक उद्देशाने गेले दोन वर्ष विविध अभ्यास, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘विज्ञान तंत्रज्ञान आधाराने परिसरात समृद्धि आणणे’ या व्यापक उद्देशाने गेले दोन वर्ष विविध अभ्यास, तज्ञांचा प्रवास, चर्चासत्र, कार्यक्रम-उपक्रम खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अधिक गतीने राबवण्यात येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सी-लेज अंतर्गत ही कामे सुरू असल्याची माहिती मुंबई येथील संशोधन पथकाला देण्यात आली.स्थानीय संस्थांचे विकासातील अनुभव, विद्यापीठात तयार होणाऱ्या संशोधनाची जोड व राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे आर्थिक पाठबळ अशा त्रिवेणी संयोगातून सीलेज प्रकल्पाची तपासणी सध्या नंदुरबार जिल्ह्यात केली जात आहे. विविध अभ्यासक, संशोधकांचा प्रवास या निमित्ताने जिल्ह्यात घडणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई येथील रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जे.बी.जोशी यांचे नेतृत्वात एका चमुने जिल्ह्यात भेट दिली.कृषि विज्ञान केंद्रात डॉ.गजानन डांगे यांनी या अभ्यास गटासमोर नंदुरबार जिल्ह्यातील विकास विषयक सद्यस्थिती, आव्हाने आणि विज्ञान तंत्रज्ञान आधारित आगामी दिशा याबाबत विस्तृत मांडणी केली. जिल्ह्यातील उद्योग उभारणी यासंदर्भात नवउद्योजक यशपाल पटेल, पाचोराबारी यांनी देखील आपले अनुभव मांडले. याप्रसंगी डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, सचिव डॉ.नितिन पंचभाई तसेच नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल चे सदस्य उपस्थित होते.कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुरू असलेल्या प्रयोगाची अत्यंत तपशीलासह माहिती केंद्रातील विषय तज्ञांनी दिली. डॉ.हेडगेवार सेवा समिती मार्फत गेली १२ वर्ष खांडबारा, नवापूर परिसरातील स्थलांतर थांबवणे, रोजगार निर्मिती याबाबत कार्य सुरू आहे. देशभरातील अभ्यासक या परिसरास अलीकडे भेटी देत आहेत. मुंबई येथील अभ्यासचमुने रविवारी खांडबारा परिसरातील विविध गावांना, उद्योजक शेतकरी युवकांच्या भेटी घेतल्या. शासन, संस्था आणि समाज यांच्या बांधणीतून सुरू असलेल्या या प्रयोगतील यश पाहून अभ्यास चमुने समाधान व्यक्त केले.कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहतोंडे यांनी याप्रसंगी जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या 'मिरची उद्योगातील तंत्रज्ञान विषयक आवश्यकता' याबाबत तज्ञांशी सविस्तर चर्चा केली. चमुने थेट मिरचीच्या पथारीला भेटी दिल्या व तेथे मिरची उद्योजकांचे प्रतिनीधी राठी बंधु यांचेशी संवाद साधला.मुंबई येथील १२ प्राध्यापक व २४ संशोधक युवकांनी जिल्ह्यात या प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पहाणी केली. त्यांच्यासोबत विद्यापीठाचे विविध विभागांचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी सी-लेजची माहिती दिली.४मिरची पथारीवर जावून तेथील कामांचा आढावा देखील त्यांनी घेतला. कृषी विज्ञान केंद्रात देखील त्यांनी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची, संशोधन प्रकल्पांची आणि इतर बाबींची माहिती जाणून घेतली. सायंकाळी हे पथक मुंबईकडे रवाना झाले.