शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील कृषी दुकानदार यांची बी-बियाणे उमगची गुणवत्ता अद्यापही तपासणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

बामखेडा : गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी यावर्षी नुकताच मशागतीला लागला असून, यासाठी लागणारे बी-बियाणे भरण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

बामखेडा : गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी यावर्षी नुकताच मशागतीला लागला असून, यासाठी लागणारे बी-बियाणे भरण्यासाठी सज्ज झाला आहे. या कृषी दुकानदारांनी आपल्या दुकानात खते, बी-बियाणे, औषधी भरून ठेवले आहे.

परंतु गतवर्षी शहादा तालुका व परिसरातील काही कृषी दुकानदारांनी कंपनीशी संगनमत करून परिसरातील काही शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री केल्याची घटना घडली होती.

यावर्षीही कृषी दुकानदार सज्ज झाले. परंतु संबंधित विभागाने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानाकडे लक्ष देऊन या दुकानात असलेले बी-बियाणे औषध याची गुणवत्ता तपासणी करणार का? की पुन्हा गतवर्षीसारखेच अशा दुकानदाराकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करून त्यांना मोकळे सोडणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेला आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट कोसळले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असल्याने शेतकरी हतबल झाला होता. त्यातच गतवर्षीपासून कोरोनाने जगभरात थैमान घातले असल्यामुळे, जनसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. त्यातच शासनाकडून कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत याकरिता वारंवार लाँकडाऊन जाहीर करण्यात येते. त्यामध्येदेखील शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा तरी कृषी विभागाने परिसरात असणाऱ्या कृषी दुकानातील बी-बियाण्याची उगम क्षमता व त्याची गुणवत्ता तपासणी करून ज्या कृषी दुकानदाराकडे बोगस बी-बियाणे निघतील त्यांच्यावर कडक कारवाई करून अशा दुकानांचे कृषी परवाने रद्द करावेत. तसेच शेतकऱ्यांनी आता कोणते बियाणे खरेदी करावे यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांना अजून मार्गदर्शन मिळालेले नाही. त्याचबरोबर कोणत्याही दुकानातील बियाण्याची उगवण क्षमता तपासली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा संभ्रमात पडला असल्याचे दिसून येत आहे.

गतवर्षी सोयबीनचे तसेच कापसाचे बी-बियाणे बोगस निघाले, त्यातच काही दुकानदारांनी खतांसाठी जाणूनबुजून अडथळा निर्माण केला. युरियाचा स्टॉक शिल्लक असतानाही शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले. यंदाही तीच परिस्थिती येऊ नये, आम्ही शेतकरी बँका, खासगी सावकार यांच्याकडून हजारो रुपये कर्ज घेऊन शेती करतो अन् जर दुकानदार बोगस बी-बियाणे देऊन आमची लूट करत असेल तर कृषी विभागाने व त्यांच्या नेमलेल्या कृषी साहाय्यकाने या गोष्टीकडे जातीने लक्ष घालण्याची गरज असून, यंदा कृषी दुकानातील सर्व बी-बियाणांची उगम क्षमता तपासणी करणे करजेचे आहे.

- गणेश पाटील, खैरवे, ता. शहादा