शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

पिप्रीपाड्याच्या नशिबी पायपीटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील माकडकुंड ता.धडगाव येथील पिप्री व अटवीपाडा या पाड्यांपर्यंत अपेक्षेनुसार रस्ते विकासाची कामे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील माकडकुंड ता.धडगाव येथील पिप्री व अटवीपाडा या पाड्यांपर्यंत अपेक्षेनुसार रस्ते विकासाची कामे झाली आहे. गावाच्या मुख्य ठिकाणापासून आठ ते नळ किलोमिटर अंतरावरील नागरिकांना प्रशासकीय कामानिमित्त गावाया मुख्य ठिकाणी पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.सर्व गावे व पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक, वाडीजोड यांच्यासह विविध योजनांच्या माध्यमातून जिल्हांतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली. परंतु कात्री ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत अनेक पाडे रस्ते विकासापासून वंचित राहिले आहे. संपूर्ण देशभर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी व गाव-पाह्यांना एकमेकांच्या संपर्कात आणण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी या योजनांचा कात्री ग्रामपंचायतीतील या पाड्यांपर्यंत योजना पोहोचल्याच नाही.रस्ते निर्माण करीत तेथील नागरिकांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कात्री ग्रामपांचायतीमार्फत ठराव मंजूर करीत शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु प्रशासन यंत्रणेकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हा भाग स्वातंत्र्योत्तर अनेक शतके उलटल्यानंतरही व सर्वत्र आधुनिकतेचा अवलंब केला जात असतानाही या पाड्यांवरील नागरिक आजही विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहिले आहे. या पाड्यांबाबत प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे नागरिकांच्या नशिबी पायपीटच आली आहे. माकडकुंड ता.धडगाव हे गाव मुख्य ठिकाण, पाटीलपाडा, पिप्रीपाडा, अटवीपाडा यासह अनेक पाड्यांमध्ये विभागले आहे. त्यातील पिप्रीपाडा, ओटवीपाडा हे पाडे माकडकुंडच्या मुख्य ठिकाणापासून आठ व नऊ किलोमिटर अंतरावर आहे. या दोन्ही पाड्यांवर अनेक कुटुंब वास्तव्यास आहे. तेथील नागरिकांचे संपूर्ण प्रशासकीय कामे माकडकुंडच्या मुख्य ठिकाणाहून होतात, या कामांसाठी त्यांना आठ ते नऊ किलोमिटर पायपीट करावी लागते.नर्मदा नदीकाठावरील अनेक गावांपैकी माकडकुंड हे एक सर्वाधिक मोठे गाव आहे. गाव एकच असले तरी त्यातील वाड्या-वस्त्याच जोडल्या गेल्या नाही. त्यामुळे गाव व पाडे जोडण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत पश्न उपस्थित होत आहे. योजना पोहोचल्याच नाही की, त्याचे अन्य मार्गाने पर्यावसन झाले? असाही मुद्दा कात्री ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.कात्री ग्रामपंचायत अंतर्गतच वाहवाणी या गावातील नोलदापाडा या ठिकाणाची देखील हीच व्यथा आहे. तेथील नागरिकांनाही काही कामासाठी १० ते १२ किलोमिटर पायपीट करावी लागते.