शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

ससप्रमुळे नंदुरबार जिल्ह्यातून परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमध्ये बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्प बांधण्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदेची परिक्रमा होत नव्हती. हे प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमध्ये बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्प बांधण्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदेची परिक्रमा होत नव्हती. हे प्रकल्प बांधल्याने पाण्याचा फुगवटा वाढत परिक्रमा मार्गाचे क्षेत्रफळही वाढले. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून परिक्रमेला सुरुवात झाली. या मार्गावर उभारलेल्या आश्रमांमध्ये नर्मना जयंतीनिमित्त अनेक उपक्रम होणार आहे.धार्मिकदृष्ट्या नर्मदा परिक्रमेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सर्वात मोठी परिक्रमा म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे. ही परिक्रमा तीन हजार ५०० किलो मिटर पेक्षा अधिक असल्याचे म्हटले जाते. नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी दक्षिण व उत्तर तटावरून गोलाकार वाहत असल्याने केवळ नर्मदा नदीचीच परिक्रमा होत असून तिच्या काठावरुपन केलेल्या गोल प्रदक्षिणेला नर्मदा परिक्रमा म्हटले जात आहे.नर्मदा ही मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहत असली तरी या नदीचा काही भाग महाराष्टÑातही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचा या नदी काठाशी मोठा संबंध येतो. व प्रश्चिम वाहिन्या नद्यांपैकी प्रमुख नदी असली आहे. अमरकंटक (मध्यप्रदेश) शिखरातून तिचा उगम पावत ती सातपुडा व विंध्य पर्वतरांगेतून वाहत आहे. ही नदी अरबी समुद्रास मिळत असून नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जात असल्याने या नदीचे धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्वही आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते.नर्मदेची परिक्रमा करणाऱ्यांना तीन-चार महिने लागतात. घनदाट जंगल असल्याने परिक्रमा करणाºया भाविकांना बरे-वाईट अनुभव येत आहे. परंतु त्यांना निसर्गरम्य वातावरणाचा सुखद आनंदही लाभत आहे. परिक्रमा करणाऱ्यांना नैसर्गिक व ताज्या फळांचाही आस्वाद घेता येत आहे. ही परिक्रमेला मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक महत्व आहे. परिक्रमा करण्याचा संकल्प केल्यास मानसिकदृष्ट्या कणखर व्हावेच लागते. बहुतांश परिक्रमावासी एकदा चालायला सुरुवात केल्यावर मागे वळून पाहायचे नसल्याचा निश्चयच करीत आहे.या मार्गावर ठिकठिकाणी सुंदर आश्रम, धर्मशाळा असे सर्व लागत होते. कधी आश्रमात, कधी धर्मशाळेत राहणे, तिथे मिळेल ते खाणे हा रोजचा दिनक्रम झाला होता. रात्रीची जागा मिळेल तिथे, अंधारात, मंदिरात, उघड्यावर मुक्कामी थांबावे लागते. असे असले तरी परिक्रमाच्या मार्गावर ठिकठिकाणी काही स्वयंसेवी संस्थांमार्फत या भाविकांसाठी निवास व भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. नर्मदेमुळे सातपुडा व विंध्य पर्वतातील भाग निसर्गाने समृद्ध केला आहे. काही ठिकाणी परिक्रमा मार्ग शेतातूनही जात आहे. परिक्रमा करणाºयांसाठी महाराष्टÑात भोमशा, सादरी, भमाणे, सावºया बिलगाव, राजबर्डी, रोहजरी, धडगाव, सुरवाणी, कुंडल, खुंटामोडी, काठी, मोलगी, बिजरीगव्हाण, सुरगस, मोकसफाटा, वडफळी येथे निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्या-त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी हे भाविकांचा प्रयत्न असतो.पुणे आळंदी येथील दंडवत बाबा यांनी दि.१८ आॅक्टोबर २०१८ रोजी नर्मदा उगमस्थान अमरकंटकपासून दंडवत नर्मदा परिक्रमा सुरु केली होती. ही परिक्रमा त्यांनी लागोपाठ दोन वर्ष चालू ठेवली.पहिली परिक्रमाही ओंकारेश्वरपासून चालू केली ती पूर्ण झाल्यानंतर दुसरी परिक्रमा ही अमरकंठकपासून सुरु केली आहे. परमपूज्य दंडवत बाबा हे नर्मदा परिक्रमा ही आपल्या नावाप्रमाणेच दंडवत करीत पूर्ण करण्यासाठी निघाले आहेत. धडगाव शहरात पोहचण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. त्यांनी खूप मोठमोठ्या दºया खोºयासह नदी-नाल्यातून ही दंडवत नर्मदा परिक्रमा त्यांना करावी लागली. धडगाव शहरात पोहचण्यासाठी दंडवत बाबा यांना एक वर्ष एक महिना पूर्ण इतका कालावधी घालवावा लागला आहे. त्यांची दंडवत यात्रा ही पूर्ण तीन वर्षाची असून ते एका दिवसाला केवळ चार किलोमिटर दंडवत परिक्रमा करीत आहे. त्यांच्यासोबत तीन सेवेकरीही आहे.४धार्मिकच नव्हे तर शारिरिक आरोग्यविषयक फायद्यासाठी देखील नर्मदेची भावभक्तीत परिक्रमा करण्यात येत आहे. या परिक्रमेसाठी येणाºया भाविकांसोबत धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील काही भाविकांनी देखील परिक्रमेला सुरुवात केली आहे. उतारपाडा (खुंटामोडी) येथील दत्तू तडवी, खुंटामोडीच्या अनेकांसह विरेंद्र भारती यांचा देखील समावेश आहे.४परिक्रमातील भाविकांसाठी झालेल्या सुवधेत आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ धडगाव या संस्थेच्या शाळांचा समावेश आहे. तर ंयाच संस्थेमार्फत पिंप्रापाणी ता. अक्कलकुवा येथे सुविधा करण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत तेथे सुविधा दिली जात नाही.