जामनेर तालुक्यातील बेटावद गावातून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शनिवारी दुपारी एका व्हॅनमध्ये अपहरण करीत तिला रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगावच्या नवीन बसस्थानकाजवळ सोडून दिल्याचे समोर आले आहे. ...
वसंत साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा बँकेचे 'वसाका'कडील ५ कोटी रुपयांचे व्याजदेखील माफ होणार आहे. ...
माजी आमदार मनीष जैन हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी एका कार्यक्रमात विधानपरिषद व विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...
नंदुरबार जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे झाले आहेत. तथापि, इतरही प्रकल्पांनी तळ गाठला आहे. आता जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. ...
मोदी लाटेचा प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहील किंवा नाही हा चर्चेचा एक विषय असताना शहर विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना-भाजप महायुतीला उमेदवारीसाठी नवा चेहरा शोधण्याची वेळ आली आहे. ...