शेतकरी सहभागातून सेंद्रीय गटशेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:43 IST2019-12-31T12:43:36+5:302019-12-31T12:43:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात लोकसहभागातून सेंद्रीय शेतीचा प्रयोग कोरीट येथील नंदुरबार कृषी निर्यात शेतकरी गटाच्या माध्यमातून राबवण्यात ...

शेतकरी सहभागातून सेंद्रीय गटशेती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात लोकसहभागातून सेंद्रीय शेतीचा प्रयोग कोरीट येथील नंदुरबार कृषी निर्यात शेतकरी गटाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे़ या उपक्रमाची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात कार्यक्रम घेण्यात आला़
परदेशातील गार्डन व्हिलेज व जिओफोनिक्स शेती भागिदारी व्यवसाय उपक्रमांतर्गत जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे़ या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी गार्डन व्हिलेजचे कॅनडा येथील प्रमुख गार्थ वाटसन, संचालक अजय सराफ, विनीत चोपडा, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, सुधीर इंगळे, दादूसिंग गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते़
कार्यक्रमात माहिती देताना गार्थ वॉटसन यांनी सांगितले की, गार्डन म्हणजे निसर्ग आहे़ निसर्गाकडे परत येण्याची वेळ मनुष्यावर आली आहे़ नष्ट होणारी जैवविविधता सेंद्रीय शेतीपद्धतीने टिकून राहील व त्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे़ शासनाची कोणतीही मदत न घेता शेतकरी सहभागातून जिल्ह्यात हा प्रयोग राबणार असल्याचेही ते शेवटी म्हणाले़ अजय सराफ यांनी जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या सेंद्रीय शेतीची कार्यक्रमाची माहिती देत पर्यावरण आणि सेंद्रीय शेतीचा परस्परविरोधी संबध याविषयी मार्गदर्शन केले़ प्रास्ताविक राजेंद्रकुमार गावीत यांनी तर आभार देविदास बोरसे यांनी केले़ या उपक्रमात सहभाग घेऊन गटशेतीच्या माध्यमातून सेंद्रीय शेती करणाºया शेतकऱ्यांना या उपक्रमाद्वारे सहाय्य करण्यात येणार असल्याची माहिती या उपक्रमात देण्यात आली़