हातगाड्या लावण्याबाबत नियोजनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:09+5:302021-04-06T04:29:09+5:30

शहरातील जुन्या कोर्टापासून तर हाट दरवाजापर्यंत रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूला व रस्त्याच्या मध्यभागी लाॅऱ्या उभ्या करून प्रचंड गर्दी ...

The need for planning for the installation of handcarts | हातगाड्या लावण्याबाबत नियोजनाची गरज

हातगाड्या लावण्याबाबत नियोजनाची गरज

शहरातील जुन्या कोर्टापासून तर हाट दरवाजापर्यंत रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूला व रस्त्याच्या मध्यभागी लाॅऱ्या उभ्या करून प्रचंड गर्दी निर्माण केली. एवढेच नव्हेतर लॉरीधारक लॉरी लावताना प्रत्येक लॉरीमध्ये १० फुटाचे अंतर असणे आवश्यक आहे. अथवा प्रत्येक कॉलनीत लाॅऱ्यांचे झोन करून गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. परंतु फक्त आदेश काढायचा पण त्याची अंमलबजावणी कागदावरच. मग कोरोना संपेल कसा? निव्वळ गाव बंद करून कोरोना जाईल असे वाटत नाही. त्यासाठी ‘बंद’ला आमचा विरोध नाही. परंतु याचे नियोजन कोणी करायचे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करून तहसील व नगरपालिका यांना भाजीपाला विक्रेत्यांसंदर्भात एक नियमावली बनवून द्यावी. भर रस्त्यावर लाॅऱ्या उभ्या करून प्रश्‍न सुटणार नाहीत. त्यासाठी विभागून दिले गेले पाहिजे. छोट्याशा रस्त्यावर हातलाॅऱ्या, ग्राहक व त्यांच्या दुचाकी असल्याने गांधी पुतळा ते द्वारकाधीश मंदिर फक्त १०० फुटांचा रस्ता पार करण्यासाठी तब्बल ५ ते १० मिनिटे लागत आहेत. म्हणून आम्ही प्रशासनाला या माध्यमातून विनंती करीत आहोत की, प्रश्‍नासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन नियोजन करावे. अन्यथा फक्त कागदावर ठेवून चालणार नाही, अशी विनंती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी एका पत्रकान्वये केली आहे.

Web Title: The need for planning for the installation of handcarts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.