शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

जिल्ह्यात राष्टÑवादी एकदिलाने काम करेल ‘मिशन २०२४’ चे आतापासूनच काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:22 IST

माझी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हापासूनच जिल्ह्यातील राष्टÑवादीतील अंतर्गत गट, तट मिटले आहेत. -डॉ.अभिजीत मोरे.

संडे स्पेशल मुलाखत-

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेले राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी अखेर डॉ.अभिजीत मोरे यांची निवड झाली आहे. या निवडीने जिल्ह्यातील राजकारणात आता नव्याने समिकरणे बदलणार आहेत. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यापासून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका हेच आपले लक्ष असून त्या कामाला आतापासूनच सुरुवात केल्याची माहिती डॉ.अभिजीत मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.आपली राजकारणाची नवी दिशा कशी राहणार?माझ्या घराण्याला राजकारणाचा वारसा आहे. यापूर्वी आपले वडिल स्व.दिलिप मोरे व आजी स्वातंत्र्य सेनानी स्व.कमलाताई मराठे यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धूरा यशस्वीपणे सांभाळली. आपणही युवक राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष होतो. आपल्या आजीच्या कारकिर्दीत राष्टÑवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर पोहचला होता. नंतरच्या काळात संघटनात्मक बांधणी खिळखिळी झाली होती. पण आता पुन्हा नव्या दमाने कामाला सुरुवात करून राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पूर्वीचे वैभव परत आणण्याचा संकल्प आहे. आपण सूत्रे स्विकारल्यापासून कामाला सुरुवात केली असून त्या दृष्टीने जिल्हाभर पक्षाची नव्याने बांधणी करणार आहोत.पक्षातील गटबाजीचे चित्र नेहमीच चर्चेत राहिले आहे ते कसे मिटविणार?पक्षात गटबाजी नव्हती. खरेतर जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धा होती हे निश्चित ही स्पर्धा म्हणजे गटबाजी म्हणता येणार नाही. माझी नियुक्ती झाली तेंव्हापासूनच स्पर्धाही संपली असून किरकोळ मतभेद असतील तेही मिटले आहेत. माझ्या नियुक्तीनंतर सर्वच जण आम्ही एकत्र भेटलो असून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने विचार केला आहे. त्यामुळे पक्षात कुठलेही मतभेद अथवा गटबाजी नाही. सर्व जण एकदिलाने काम करणार आहोत.‘मिशन २०२४’ च्या नियोजनासंदर्भात डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले की, आजपासूनच आम्ही जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात व लोकसभा मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी काम करणार आहोत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सर्व व्यूहरचना असणार आहे. पुढे पक्षाच्या आदेशानुसार विधानसभा मतदारसंघ व लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्यात येईल. त्यावेळी कुठे निवडणूक लढवावी त्याची दिशा स्पष्ट होईल.केवळ लोकसभा व विधानसभा निवडणुकाच नव्हे तर ग्रामपंचायतीपासून नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राष्टÑवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणे निवडणूक लढवू शकेल असे नियोजन राहणार आहे. मध्यंतरीच्या काळात कोण पक्ष सोडून गेले, त्याचे विचार करण्यापेक्षा पक्षात अनेक नवीन कार्यकर्ते येऊ इच्छित आहेत. त्याबाबत विचार करू.