शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्ह्यात राष्टÑवादी एकदिलाने काम करेल ‘मिशन २०२४’ चे आतापासूनच काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:22 IST

माझी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हापासूनच जिल्ह्यातील राष्टÑवादीतील अंतर्गत गट, तट मिटले आहेत. -डॉ.अभिजीत मोरे.

संडे स्पेशल मुलाखत-

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेले राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी अखेर डॉ.अभिजीत मोरे यांची निवड झाली आहे. या निवडीने जिल्ह्यातील राजकारणात आता नव्याने समिकरणे बदलणार आहेत. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यापासून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका हेच आपले लक्ष असून त्या कामाला आतापासूनच सुरुवात केल्याची माहिती डॉ.अभिजीत मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.आपली राजकारणाची नवी दिशा कशी राहणार?माझ्या घराण्याला राजकारणाचा वारसा आहे. यापूर्वी आपले वडिल स्व.दिलिप मोरे व आजी स्वातंत्र्य सेनानी स्व.कमलाताई मराठे यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धूरा यशस्वीपणे सांभाळली. आपणही युवक राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष होतो. आपल्या आजीच्या कारकिर्दीत राष्टÑवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर पोहचला होता. नंतरच्या काळात संघटनात्मक बांधणी खिळखिळी झाली होती. पण आता पुन्हा नव्या दमाने कामाला सुरुवात करून राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पूर्वीचे वैभव परत आणण्याचा संकल्प आहे. आपण सूत्रे स्विकारल्यापासून कामाला सुरुवात केली असून त्या दृष्टीने जिल्हाभर पक्षाची नव्याने बांधणी करणार आहोत.पक्षातील गटबाजीचे चित्र नेहमीच चर्चेत राहिले आहे ते कसे मिटविणार?पक्षात गटबाजी नव्हती. खरेतर जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धा होती हे निश्चित ही स्पर्धा म्हणजे गटबाजी म्हणता येणार नाही. माझी नियुक्ती झाली तेंव्हापासूनच स्पर्धाही संपली असून किरकोळ मतभेद असतील तेही मिटले आहेत. माझ्या नियुक्तीनंतर सर्वच जण आम्ही एकत्र भेटलो असून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने विचार केला आहे. त्यामुळे पक्षात कुठलेही मतभेद अथवा गटबाजी नाही. सर्व जण एकदिलाने काम करणार आहोत.‘मिशन २०२४’ च्या नियोजनासंदर्भात डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले की, आजपासूनच आम्ही जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात व लोकसभा मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी काम करणार आहोत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सर्व व्यूहरचना असणार आहे. पुढे पक्षाच्या आदेशानुसार विधानसभा मतदारसंघ व लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्यात येईल. त्यावेळी कुठे निवडणूक लढवावी त्याची दिशा स्पष्ट होईल.केवळ लोकसभा व विधानसभा निवडणुकाच नव्हे तर ग्रामपंचायतीपासून नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राष्टÑवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणे निवडणूक लढवू शकेल असे नियोजन राहणार आहे. मध्यंतरीच्या काळात कोण पक्ष सोडून गेले, त्याचे विचार करण्यापेक्षा पक्षात अनेक नवीन कार्यकर्ते येऊ इच्छित आहेत. त्याबाबत विचार करू.