शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ZP Election 2020: नंदुरबारमध्ये भाजपा ठरला मोठा पक्ष, पण बहुमताचा आकडा दूरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 13:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे ५६ पैकी ४० गटांचा निकाल जाहिर झाला असून या जिल्हा परिषदेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे ५६ पैकी ४० गटांचा निकाल जाहिर झाला असून या जिल्हा परिषदेत कुणाही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ दरम्यान त्रिशंकूकडे वाटचाल असल्याने निकालानंतर कोणत्या पक्षांची आघाडी होते हा उत्सुकतेचा विषय आहे़ आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी ह्या पराभूत झाल्याने काँग्रेससाठी तो मोठा धक्का आहे़जिल्हा परिषदेचे ५६ गट व जिल्ह्यातील सहा पंचायत समितीचे ११२ गणांसाठी मंगळवारी सरासरी ६८ टक्के मतदान झाले होते़ त्याची मतमोजणी बुधवारी सकाळी १० पासून सुरु झाली़ दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ४० गटांची मतमोजणी पूर्णत्त्वास आली असून त्यात सर्वाधिक १७ जागा भाजपाला मिळाल्या आहेत़ त्यापाठोपाठ काँग्रेसला १५, शिवसेना पाच व राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत़ उर्वरित १६ गटांची मतमोजणी बाकी आहे़ त्यातील प्राथमिक चित्र पाहता कुणाही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे़नेत्यांचे वारसदार विजयीया निवडणूकीत जवळपास जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांचे वारसदार आपले भाग्य आजमावित होते़ त्यात ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे दोन्ही पुत्र अजित नाईक व दिपक नाईक हे विजयी झाले आहेत़ माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या कन्या अ‍ॅड़ सिमा वळवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुत्र अभिजीत पाटील, शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी हे विजयी झाले आहेत़ सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या देखील लोणखेडा गटातून विजयी झाल्या आहेत़अनेकांना पराभवाचा धक्काअनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे़ त्यात आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी या तोरणमाळ ता़ धडगाव गटातून पराभूत झाल्या आहेत़ त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराने पराभूत केले आहे़ तर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक हे खांडबारा गटातून पराभूत झाले आहेत़ जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती डॉ़ भगवान पाटील हे देखील म्हसावद गटातून पराभूत झाले आहेत़

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना