शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारला गरज ‘सुरक्षेच्या’ शिक्षणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवसेंदिवस वाढीस लागत असलेल्या कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा असे आवाहन शासन व ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिवसेंदिवस वाढीस लागत असलेल्या कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा असे आवाहन शासन व प्रशासन दररोज करत आहे़ परंतु नंदुरबार शहरात मात्र सर्वकाही आलबेल असल्याच्या थाटात नागरीक वावरत असून दोन पोलीस ठाण्यांनी सुमारे ५०० जणांवर कारवाई करुन मास्क वापराबाबत गांभिर्य नसल्याचे चित्र पुन्हा दिसून आले़
जिल्ह्यात कोरोनबाधितांचा आकडा येत्या काही दिवसात १ हजाराच्या पुढे जाणार आहे़ मयतांची संख्या आधीच वाढून ५० च्या जवळ गेली आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना किमान मास्क लावून यावे असा आग्रह प्रशासनाचा आहे़ परंतु बरेच नागरिक मात्र हा आग्रह मोडून संसर्गाला खतपाणी घालत असल्याचे दिसून आले आहे़ ‘लोकमत’ने शहरातील मास्क वापराबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेकांना मास्क वापरण्याची कोणतीही गरज नसल्याच्या त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येत होता़ मास्कचा वापर हा सार्वजनिक जागी तसेच सोशल डिस्टन्सिंग नसल्यास प्रभावी ठरत असतानाही अनेक जण त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून आले़ शहरातील सुभाष चौक, हाटदरवाजा, सराफ बाजार, मंगळबाजार, नेहरू चौक परिसरात अनेक जण विनामास्क वापरता फिरत असल्याचे सहज नजरेस पडत होते़ बहुतेक जण दुचाकींवर तीन सीट बसूनही मास्कचा वापर करत नसल्याचे समोर आले़ काही व्यावसायिक अर्धवट मास्कचा वापर करुन सुरक्षा करण्याचा प्रयत्न करत होते़ यातून नंदुरबार शहरात वावरणाºया नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे समोर आले आहे़

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा जिल्हाधिकारी यांनी लागू करत मनाई आदेश काढले आहेत़ सोबत साथरोग प्रतिबंधात्मक कायदाही लागू करण्यात आला आहे़ या कायद्यांन्वये उपाययोजना न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणे गुन्हा ठरतो़
दोन्ही कायदे लागू असतानाही शहरातील उपनगर पोलीस हद्द व शहर पोलीस ठाणे हद्दीत अनेकजण मास्क विना फिरत असल्याचे समोर आले होते़ शहर पोलीस ठाणे हद्दीत कायदा लागू झाल्यापासून आजअखेरीस ३०० तर उपनगर पोलीस ठाणे हद्दीत ११५ जणांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे़
दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दर दिवशी दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल होत असतानाही मास्कविना फिरणारे आढळून येत आहेत़ दोन्ही ठाण्यात दररोज किमान चार जणांवर गुन्हे दाखल होतात़

समोरासमोर येणाºया दोघांनी मास्क घातला असेल तर संसर्गाचा धोका कमी असतो़ एकाने मास्क न घालणे व दुसºयाने घालणे यातून तसेच मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास कोरोनाचा संसर्ग वाढतो़ नागरिकांनी योग्य त्या पद्धतीने मास्कचा वापर करावा़ मास्क वापरण्याआधी स्वत:चे हात स्वच्छपणे धुऊन वापरल्यास संसर्गाचा धोका कमी होता़
-डॉ़ हार्दिक पटेल, साथरोग नियंत्रण तज्ञ, नंदुरबाऱ