शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

नंदुरबारात महिनाभर आधीच मिरची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:52 IST

नंदुरबार बाजार समिती : सुरुवातीलाच भाव 1400 ते 2100 रुपयांर्पयत

नंदुरबार : यंदा महिनाभर आधीपासून लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. भाव देखील 1400 ते 2100 रुपयांर्पयत मिळत असल्यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. हिरव्या मिरचीला अगदीच कमी भाव मिळत असल्यामुळे आता मिरची लाल झाल्यावर ती थेट बाजारात विक्रीसाठी आणली जावू लागली आहे. सध्या आवक कमी असली तरी येत्या काळात ती वाढण्याची शक्यता आहे.नंदुरबारच्या बाजारात साधारणत: ऑक्टोबरच्या दुस:या किंवा तिस:या आठवडय़ापासून लाल मिरचीची आवक सुरू होत असते. खान्देशात मिरचीचे सर्वात मोठे मार्केट म्हणून नंदुरबारच्या मार्केटकडे पाहिले जाते. येथील बाजारभावावरूनच इतर मार्केटमधील बाजार भावावर देखील परिणाम होत असतात. यंदा मिरचीची लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत असली तरी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पादकता कमी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली. परंतु वेळेआधीच लाल मिरची बाजारात आल्याने पथारीवर लाल गालिचा पसरण्यास सुरुरवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून साधारणत: 200 ते 400 क्विंटल आवक होत आहे. येत्या काळात ती आणखी वाढण्याची शक्यताही बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी वर्तविली.हिरवी मिरचीला भाव कमीसध्या बाजारात हिरवी मिरचीची ढेसर झाली आहे, परिणामी भाव अवघा 700 ते 800 रुपये क्विंटल असा मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून बाजार समितीच्या आवारातच हिरवी मिरचीची पथारी देखील पहावयास मिळत आहे. हिरवी मिरचीला एवढा कमी भाव मिळत असल्यामुळे शेतक:यांनी आता ती लाल करूनच बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी देखील हिरवी मिरची साधारणत: सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासूनच दाखल झाली होती. यंदासारखीच आवकची परिस्थिती होती. परिणामी बाजार समितीच्या आवारात ठिकठिकाणी हिरवी मिरची वाळविण्यासाठी पथारीसारखी टाकली जात होती. लाल झाल्यावर विक्री हिरव्या मिरचीला भाव कमी असल्यामुळे शेतकरी थोडा त्रास सहन करून मिरची लाल झाल्यावरच ती बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या तीन दिवसात दररोज सरासरी 300 ते 400 क्विंटल आवक होत  आहे. बाजार समितीत दररोज तीन ते चार वाहने येऊ लागली आहेत. सध्या येणारी मिरचीची प्रतवारी देखील चांगल्या प्रकारची असल्याचे व्यापा:यांचे म्हणने आहे. आवक होणा:या मिरचीमध्ये व्हीएनआर आणि लाली या जातीच्या मिरचीचा समावेश आहे. लवकरच फाफडा, व्हिनेगार, शंकेश्वरी या मिरचीची आवक होण्याची शक्यता आहे. साधारणत: दस:यानंतर येथील मिरची बाजारात सरासरीच्या तुलनेत आवक सुरू होण्याची शक्यता      आहे.पाऊस नसल्याने खरेदीसध्या पाऊस नसल्याने लाल मिरची खरेदी करण्यास व्यापारीही उत्सूक आहेत. लाल मिरची खरेदी केल्यास ती सुकविण्यासाठी पथारींवर टाकावी लागते. सध्या पावसाळा सुरू असला तरी पावसाचे कुठलेही चिन्हे नाहीत. त्यामुळे खरेदी केलेली मिरची सुकवून घेण्यासाठी पुरेसा     कालावधी मिळणार असल्यामुळे मिरची खरेदीला ब:यापैकी प्रतिसाद आहे. पाऊस आल्यास मिरची पथारीवरील मिरची सांभाळण्याची मोठी कसरत होत असते. त्यामुळे जास्तीत जास्त व्यापारी ऑक्टोबरनंतरच मिरची खरेदीला पसंती देत असतात.