शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
5
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
6
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
7
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
8
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
9
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
10
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
11
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
12
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
13
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
14
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
15
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
16
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
17
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
18
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
19
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
Daily Top 2Weekly Top 5

धांद्रे गावाला नाल्यातील पाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील धांद्रे खुर्द गावालगत असलेल्या नाल्याला पावसाचे पाणी आल्यामुळे दिवसभर गावातील लोकांचा संपर्क तुटला ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील धांद्रे खुर्द गावालगत असलेल्या नाल्याला पावसाचे पाणी आल्यामुळे दिवसभर गावातील लोकांचा संपर्क तुटला होता. लोकांना शेतीकामासाठी पाच फूट पाण्यातून नाला पार करुन जावे लागते. या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरुन ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. धांद्रे ग्रामस्थांना दरवर्षी ही समस्या सतावत असून प्रशासनाने तात्पुरता रस्ता तयार करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आदिवासीबहुल वस्तीचे असलेले धांद्रे खुर्द गावाची लोकसंख्या सुमारे ६०० पर्यंत आहे. जयनगरपासून पाच किलोमीटर अंतरावर निंबोरालगत असलेल्या या गावाला अद्यापपर्यंत महसुली दर्जा मिळाला नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील सर्वच कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असल्याने त्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागते. धांद्रे खुर्द गावाला चौफेरे नाल्याचा वेढा आहे. पावसाळ्यात या नाल्याला पाणी येत असल्याने आजूबाजू सर्वत्र पाणी व मध्येच गाव अशी एखाद्या बेटासारखी परिस्थिती निर्माण होते. वाहन तर सोडा बैलगाडी काढणेही या नाल्यातून मुश्कील होते. त्यामुळे नाल्यात असलेल्या चार ते पाच फूट पाण्यातून मार्गक्रमण करीत शेतात मजुरीसाठी जावे लागते. पाण्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने विंचू, सर्प यांचाही धोका असतो. गावाच्या चौफेर असलेल्या नाल्यात संपूर्ण पावसाळ्यात पाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी निर्माण होऊन ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्नही उभा ठाकतो.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते ईश्वर माळी यांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे नाल्याला पाणी आल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. धांद्रे खुर्द ग्रामस्थांना पावसाळ्यात दरवर्षी ही समस्या सतावत असल्याने प्रशासनाने किमान ये-जा करण्यासाठी नाल्यावर फरशी पूल किंवा रस्ता बनवून पावसाळ्यात होणारे हाल थांबविण्याची मागणी त्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे.