शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वंचितांचे दु:ख निवारणाच्या मंत्राने आयुष्य बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:00 PM

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शक व गुरू भेटत गेले. त्यातूनच ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शक व गुरू भेटत गेले. त्यातूनच आयुष्याची बागही बहरत गेली. म्हणूनच आज आपण शेकडो भावी वकीलांच्या आयुष्यात सुगंध देऊ शकलो आणि असंख्य वंचितांना न्याय-हक्क मिळवून देऊ शकलो. या सर्व ज्ञानाचा पाया खऱ्या अर्थाने रचला तो आपले वडील स्व.बटेसिंग रघुवंशी यांनी. त्यांनी बालपणीच ‘गरीब, शोषितांच्या दु:खाकडे बघ, धनिकांचे सुख बघू नको’ हा सल्ला दिला आणि त्यातूनच खºया अर्थाने आयुष्य बदलले. ही प्रतिक्रिया आहे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ व भारताचे माजी सॉलिसीटर आॅफ जनरल अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी यांची.अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी यांचे नाव आज महाराष्टÑातील नामांकीत विधीतज्ज्ञात घेतले जाते. महाराष्टÑ-गोवा बार असोसिएशनचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. आपल्या गुरुविषयी भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे गुरू भेटत गेले. आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर नंदुरबारात एल.टी. हायस्कूल व श्रॉफ हायस्कूलमध्ये शिक्षण झाले. पुढे महाविद्यालयात अ‍ॅड.पी.एन. देशपांडे आणि डॉ.पीतांबर सरोदेसारखे गुरू भेटले. पण खरे आयुष्य कळले ते पुण्याच्या होस्टेल जीवनात. होस्टेलमध्ये मिळालेल्या मित्रांनी खूप काही शिकवले. मुंबईत नंतर विधी क्षेत्रातील गुरू अ‍ॅड.के.जे. अभ्यंकर, बापूसाहेब जहागिरदार, शेखर जहागिरदार यांनी वकीली क्षेत्रातील मार्गदर्शन केले आणि पुढे आपले आयुष्यच बदलले.महाराष्टÑातील तीन अ‍ॅडव्होकेट जनरल अरविंद बोबडे, बी.आर. मनोहर व चंद्रकांत सावंत यांनी सरकारी वकील शिकवली.बापूसाहेब जहागिरदार यांनी इंग्रजी पेपर वाचनाची शिकवण दिल्याने इंग्रजीत प्रभुत्व मिळाले.पीतांबर सरोदे यांच्यामुळे हिंदीचे वक्तृत्व मिळाले.शालेय जीवनात यशवंत स्वर्गे यांच्यासारखे गुरू मिळाले.भारताचे सॉलिसीटर झाल्यानंतर राष्टÑीय विधीतज्ज्ञ राम जेठमलाणी, मीलन बॅनर्जी यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन मिळाले.