शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Maharashtra Election 2019 : राजकारणाचा डावही बदलला अन् भिडूही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 4:30 AM

नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला.

- रमाकांत पाटीलनंदुरबार जिल्ह्यातील राजकारणाचा सारीपाट गेल्या महिनाभरातील घडामोडींमुळे पूर्णत: बदलला आहे. पक्षांतराच्या लाटेत काँग्रेसचे नेते भाजपत आणि शिवसेनेत आले तर भाजपचे आमदार काँग्रेसचे उमेदवार झाल्याने या जिल्ह्यातील राजकारणाचा डावही बदलला असून भिडूही बदलले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाचा डाव कोण जिंकणार हा एक औत्सुकतेचा विषय ठरला आहे.नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. माणिकराव गावीत आणि सुरुपसिंग नाईक या जोडीने जिल्ह्यात पाच दशके राजकारणाची सूत्रे हाती ठेवली. आता मात्र हे दोन्ही नेते वयोमानाने थकल्याने त्यांचे वारसदार निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत. विशेष म्हणजे नाईक-गावीतांची मैत्री घट्ट होती. पण या निवडणुकीत त्यांचे वारसदार एकमेकांच्या विरोधात नवापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसतर्फे शिरीष नाईक तर भाजपतर्फे भरत गावीत हे उमेदवारी करीत असल्याने ही लढत लक्षवेधी ठरली आहे.दुसरीकडे पक्षांतराच्या लाटेत अनेक नेत्यांनी दल बदलल्याने विधानसभेची ही निवडणूक जिल्ह्यासाठी राजकारणाची नवी दिशा ठरवणारी आहे. जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसतर्फे सलग सातवेळा आमदार असलेले अ‍ॅड.के.सी. पाडवी हे पुन्हा उमेदवारी करीत आहेत. त्यांना यावेळी शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. अर्थात यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ही जागा जिंकण्यासाठी रघुवंशी आपली प्रतिष्ठा पूर्णपणाला लावणार त्यामुळे येथील लढतही रंगतदार ठरणार आहे. शहादा मतदारसंघात भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. ते मुंबईला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी हे रिंगणात आहेत. याठिकाणी अपक्ष उमेदवारही रिंगणात राहणार असल्याने येथील निवडणूक देखील चुरशीची ठरणार आहे.

पक्षांतराने रंगतभाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी रातोरात काँग्रेस पक्षात प्रवेश करुन ऐनवेळी आपला मतदारसंघ सोडून नंदुरबार मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली. याठिकाणी काँग्रेसला सक्षम उमेदवार नव्हता. पण रात्रीतून घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी नंदुरबार मतदारसंघातील लढत रंगतदार केली आहे.आघाडीच्या वाटाघाटीत शहादा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याने राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी नाराजी व्यक्त करीत पक्ष सोडला. त्यामुळे जिल्ह्यात या पक्षाचे आता प्रभावी कार्यकर्ते कुणीही नाही. माजी आमदार शरद गावीत हेदेखील नवापूरमधून इच्छुक होते. पण त्यांनीही पक्ष सोडला आणि नवापुरातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.अक्कलकुवा युतीने शिवसेनेला सोडला आहे. त्यामुळे येथे महिनाभरापूर्वी उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपत गेलेले विजय पराडके व किरसिंग वसावे या दोन्ही कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपमधून १५ दिवसात शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandurbar-acनंदुरबार