शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

नंदुरबार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेला मोठा वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 12:47 IST

अर्चना पठारे : वेळेवर मजुरी देण्याचे प्रमाण 50 वरून 89 टक्के, अपुर्ण कामे पुर्ण

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांची उद्दीष्टपुर्ती झाल्याने जिल्हा राज्यात 16 व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रय} सुरू आहेत. मजुरांना वेळेवर मजुरी देण्याबाबत आपण कटाक्षाने लक्ष घातले असून त्याचा परिणाम योजनेच्या विश्वासहार्तेवर होत आहे. शिवाय अपुर्ण कामांबाबत जिल्हा राज्यात सर्वात मागे होता तो दहा महिन्यात वरच्या स्थानावर आला आहे. त्याचे समाधान असून आता रेशीम उत्पादनाचे प्रयोग योजनेच्या माध्यमातून राबविण्याचा मानस असल्याची माहिती रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी ‘लोकमत’ संवाद उपक्रमात बोलतांना दिली.उपजिल्हाधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील, मनोज शेलार उपस्थित होते. डॉ.अर्चना पठारे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांची सद्य स्थिती, या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम व कामे, मजुरांचे स्थलांतर यासह विविध बाबींची माहिती दिली. त्यांनी सांगितले, जिल्ह्यात रोजगार हमी योजनेला मोठा वाव आहे. दुर्गम भागात अर्थात धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर या तालुक्यांमधून कामांची मोठी मागणी असते. या योजनेअंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्याची प्रयोजन असते. त्यामुळे मजुरांनी साध्या कागदावर दोन ओळीत जरी कामाची मागणी केली तरी  त्यांना पाच किलोमिटरच्या आत उपलब्ध करून द्यावी लागत असते. तोच प्रय} सध्या सुरू आहे.अपुर्ण कामे पुर्ण करण्यावर भरजिल्ह्यात रोहयोअंतर्गत 2011-12 या वर्षापासूनची जवळपास 26 हजार कामे अपुर्ण होती. अपुर्ण कामांमध्ये जिल्ह्याचा क्रमांक राज्यात शेवटून चौथ्या क्रमांकावर होता. आपण पदभार स्विकारल्यानंतर जिल्हाधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली अपुर्ण कामे पुर्ण करण्यावर भर देत आहोत. त्यामुळे अपुर्ण कामे पुर्ण करण्याचा टक्केवारीत जिल्हा आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. मजुरांना वेळेवर मजुरीजिल्ह्यातील रोहयोच्या कामांवरील मजुरांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याची ओरड होती. त्यामुळे अनेक मजुर कामापासून दुरावले होते. त्याचा परिणाम स्थलांतरावर दिसून आला. आपण पदभार घेतल्यानंतर या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष घातले. सातत्याने कामांवरील भेटी व पाठपुराव्यामुळे त्यातही सुधारणा झाली आहे. यापुर्वी मजुरांना मजुरी देण्याच्या बाबतीत जिल्हा 16 व्या क्रमांकावर होता तो आता चौथ्या स्थानावर आहे. हे पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रय} राहणार आहे. स्थलांतरीतांची आकडेवारीजिल्ह्यात दिवाळी ते उन्हाळा या चार ते पाच महिन्यात मोठय़ा प्रमाणावर मजुरांचे स्थलांतर होते. स्थलांतरीतांची आकडेवारी मात्र कुठेही उपलब्ध राहत नाही. ती उपलब्ध करण्यासाठी प्रय} सुरू आहेत. स्थानिक ठिकाणीच काम आणि वेळेवर मजुरीची रक्कम मिळाल्यास मजुरांचे स्थलांतर होणार नाही. त्यावर आपला भर राहणार असल्याचे डॉ.अर्चना पठारे यांनी सांगितले.रेशीम लागवड व फळबागजिल्ह्यात फळबाग लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. गेल्या काही वर्षात फळबागचे क्षेत्र वाढले आहे. त्याअंतर्गत मजगीची कामे घेण्यावर भर देण्यात आला आहे. फळबाग आणि मजगीच्या कामांचे नवापूर तालुक्यात एक, दोन ठिकाणी चांगले प्रयोग झाले आहेत. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रेशीम लागवडीवर देखील भर दिला जाणार आहे. नाशिक येथील रेशीम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ही योजना कशी राबविता येईल याबाबत चर्चा करण्यात आली आहे. महिना 70 ते 80 हजार रुपये उत्पन्न या माध्यमातून मिळू शकेल. त्यामुळे जिल्ह्यात या उद्योगाला चांगला वाव राहणार आहे. त्यादृष्टीने आपला प्रय} सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणंदचे 200 रस्ते होणारपालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात 200 रस्त्यांचे टार्गेट आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. ग्रामसभेने ठराव दिल्यावर प्राधान्य क्रम ठेवून रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.नागपूर जिल्ह्यात प्रोबेशनरी प्रांताधिकारीपदाचे कामकाज पाहिल्यानंतर नंदुरबार येथे रोहयो उपजिल्हाधिकारी पदाची पहिलीच नियमित नियुक्ती मिळाली आहे. थेट नागपूर जिल्ह्यातून नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी आपण स्वत:हून मागून घेतली आहे. आदिवासी भागात काहीतरी चांगले करता येईल याबाबत आपण सुरुवातीपासूनच मनात निर्धार केला होता. या भागात येण्यापूर्वी जे ऐकले होते त्यापेक्षा बरीच तफावत व वेगळी स्थिती येथे दिसून आली. येथे काम करण्यास वाव आहे, शिवाय अधिकारी व लोकांचेही खूप सहकार्य मिळते. त्यामुळे काम करण्याचा आनंद वेगळाच आहे.  जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांचे मार्गदर्शन व सहकारी अधिका:यांचे सहकार्य नेहमीच मिळत असते. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 20 लाख 11 हजार प्रतीमजूर प्रतीदिन रोजगार उपलब्ध झाला. जवळपास 60 कोटी रुपये त्यावर खर्च झाला आहे. दोन लाख 90 हजार जणांना जॉबकार्ड दिली गेली आहेत. सद्य स्थितीत एक लाख 74 हजार काम करणारे मजुर आहेत. 2017-18 मध्ये 14 हजार कामे पुर्ण केली असल्याचेही डॉ.अर्चना पठारे यांनी सांगितले.