शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाचीही भीती झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

जिल्ह्यात २०१७ या वर्षात ३ हजार ३४० जणांना क्षयरोग झाला होता. २०१८ या वर्षात ३ हजार १७२ रुग्ण, ...

जिल्ह्यात २०१७ या वर्षात ३ हजार ३४० जणांना क्षयरोग झाला होता. २०१८ या वर्षात ३ हजार १७२ रुग्ण, २०१९ या वर्षात ३ हजार २५९, तर २०२० या वर्षात २ हजार ९६ जणांना क्षयरोग असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले होते. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या चालू वर्षात विभागाने केलेल्या चाचण्यांनुसार ४६० जणांना क्षयरोग असल्याची माहिती दिली गेली होती. २०१७ पासून रुग्णांना वेळेवर दिल्या जाणाऱ्या औषधी आणि योग्य उपचार यामुळे रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. अभिजित गोल्हार यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, कोरोना हा आजार श्वसनाचा आजार आहे. त्याचा विषाणू हा खोकलल्यास किंवा शिंकल्यास पसरून त्याचा संसर्ग होतो. क्षयरोग किंवा टीबी अर्थात ट्यूबरक्यूलोसिस हा आजार ही कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर पूर्वीपासून केला जातो. कोरोनामुळे नागरिकांमध्ये मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाच्या संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे. सोबत लाॅकडाऊनमुळे गर्दीही कमी असल्याने ही संख्या आणखी आटोक्यात आली आहे.

एकीकडे मास्कमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी झाला असताना क्षयरोगींचा मृत्यूदरही कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२०-२०२१ या वर्षात क्षयरोगामुळे ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मृत्यूचा हा दर पाच टक्के असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. क्षयरोगाची लागण झालेल्या १०० पैकी पाच रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती, परंतु गेल्या एक वर्षात ही टक्केवारी एक टक्के असल्याचे स्पष्ट होत आहे.