शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतकऱ्यांच्या माथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 5:18 PM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणाºया जिल्ह्यातील ४७ हजार ५९० पैकी २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफी’ रखडली आहे़

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची ३१ डिसेंबरला मुदत संपणारनंदुरबार जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांना कर्जमुक्तीनंदुरबार जिल्ह्यात ४७ हजार ५९० लाभार्थी

भूषण रामराजे ।नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणाºया जिल्ह्यातील ४७ हजार ५९० पैकी २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफी’ रखडली आहे़ विशेष म्हणजे योजनेची मुदत संपण्याचा अवधी हा ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत असल्याने उर्वरित शेतकºयांचे काय असा प्रश्न आहे़मार्च २०१७ पासून राज्यशासनाने शेतकºयांच्या कर्जमाफीची योजना आणली होती़ यातंर्गत बँकांकडून घेतलेल्या पीककर्जापैकी दीड लाख रुपये माफ करण्यात आले होते़ यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर करुन दिले होते़ या आॅनलाईन अर्जानंतर शासनाकडून देण्यात येणाºया याद्यांनुसार बँकांकडे थकीत असलेले दीड लाखांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरु झाली़ बँकेत दीड लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकºयांच्या याद्यांचा पहिल्या टप्प्यात निपटारा करण्यात आला होता़ सुरुवातीला वेग पकडणारी ही सन्मान योजना गेल्या वर्षभरापासून रडखडत सुरु होती़जिल्ह्यातील ९ राष्ट्रीयकृत बँका, १ खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २७ हजार १९४ खातेदार शेतकºयांसाठी शासनाकडून १०७ कोटी ११ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यास मंजूरी देण्यात आली होती़ गेल्या वर्षभरात या २७ हजार शेतकºयांपैकी केवळ २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ उर्वरित ३ हजार २७९ शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया ही तांत्रिक अडचणींमुळे रखडली आहे़ येत्या काळात त्यांनाही कर्जमाफी देण्यात येणार आहे़परंतू उर्वरित १९ हजार ६७६ अर्जदार शेतकºयांच्या कर्जमाफीबद्दल कारवाई होत नसल्याने त्यांच्या बँकांमध्ये चकरा सुरुच आहेत़ बहुतांश शेतकºयांच्या खात्यावर पैसे आल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू त्यांचे पीककर्ज हे दीड लाखांपेक्षा अधिक आहे़ यंदा दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटली आहे़ त्यात बँकेत पैसे भरण्यासाठी पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागणार असल्याने शेतकºयांनी पाठपुरावा सोडून दिला आहे़ येत्या ३१ डिसेंबरपर्यंत या योजनेची अंतिम मुदत असल्याची माहिती आहे़ शासनाकडून त्यास साधारण तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे संकेत आहेत़जिल्हा बँकेचे १५ हजार खातेदारगेल्या वर्षभरात बँक आॅफ बडोदाने ९८४ शेतकºयांना ५ कोटी ५५ लाख, बॅक आॅफ इंडियाने ८९२ शेतकºयांना ६ कोटी ३२ लाख, बँक आॅफ महाराष्ट्राने १ हजार ९७१ शेतकºयांना ११ कोटी ५८ लाख ८६ हजार, सेंट्रल बॅक आॅफ इंडियाने २ हजार ५३२ शेतकºयांना ११ कोटी ३६ लाख, देना बँकेने ११४ शेतकºयांना ५ कोटी ५३ लाख, ग्रामीण बँकेने १६२ शेतकºयांना ६ कोटी ९४ लाख, स्टेट बँकेने १ हजार ५०३ शेतकºयांना १२ कोटी ३८ लाख, युनियन बॅकेकडून ८८ शेतकºयांना ७ कोटी ८१ लाख तर जिल्हा बँकेकडून १५ हजार ६४९ शेतकºयांना ४० कोटी ६३ लाख ४६ हजार रुपयांचे वितरण केले आहे़

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी