शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर बिहारला जाण्याची गरज भासली नसती - गुलाबराव पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:37 IST

Gulabrao Patil : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे हा ज्याचा त्याचा  प्रश्न असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

नंदुरबार : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि शिंदे गटांच्या सभांसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यापासून ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आदी प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधला. 

आदित्य ठाकरे देशातील युवा नेत्यांना भेटण्यासाठी विविध राज्यांचा दौरा करणार आहे. काल बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. या संदर्भात बोलताना आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते, तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती, अशी बोचरी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. 

कालच्या सिन्नर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याचा आरोप होत असून मुख्यमंत्री स्वतः कर्तृत्वान असून त्यांना स्वतःचे भविष्य पाहण्याची गरज नसून ते भविष्यकाराचे भविष्य पाहतील. राजकारणात नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांच्या आदर करावा लागतो. कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात असलेल्या जत तालुक्यातील गावांवर आपला दावा केला आहे. या दाव्यानंतर  गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्रातील सीमा भागातील ग्रामपंचायतीचा साधा वार्ड सुद्धा कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही. राज्य सरकारसाठी हा प्रश्न संवेदनशील असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. 

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सुरू असून वाद वैयक्तिक पातळीवर गेले आहेत. त्यामुळे दोघा नेत्यांनी संयम ठेवावे. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून दोनी नेत्यांनी बोलताना संयम ठेवावा कुणी आरे केले तर दुसरा कारे करेल, त्यामुळे सामाजिक जीवनात वागताना तारतम्य  ठेवणे महत्त्वाचे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे हा ज्याचा त्याचा  प्रश्न असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. राज्यातील महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. निवडणुका ह्या प्रशासकीय बाब असून याचा कोणी काही अर्थ काढू नये जो तो पक्ष याचा आपल्यासाठी सोयस्कर पद्धतीने अर्थ काढत असतो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलAaditya Thackerayआदित्य ठाकरेPoliticsराजकारण