शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर बिहारला जाण्याची गरज भासली नसती - गुलाबराव पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:37 IST

Gulabrao Patil : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे हा ज्याचा त्याचा  प्रश्न असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

नंदुरबार : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि शिंदे गटांच्या सभांसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यापासून ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आदी प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधला. 

आदित्य ठाकरे देशातील युवा नेत्यांना भेटण्यासाठी विविध राज्यांचा दौरा करणार आहे. काल बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. या संदर्भात बोलताना आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते, तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती, अशी बोचरी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. 

कालच्या सिन्नर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याचा आरोप होत असून मुख्यमंत्री स्वतः कर्तृत्वान असून त्यांना स्वतःचे भविष्य पाहण्याची गरज नसून ते भविष्यकाराचे भविष्य पाहतील. राजकारणात नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांच्या आदर करावा लागतो. कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात असलेल्या जत तालुक्यातील गावांवर आपला दावा केला आहे. या दाव्यानंतर  गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्रातील सीमा भागातील ग्रामपंचायतीचा साधा वार्ड सुद्धा कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही. राज्य सरकारसाठी हा प्रश्न संवेदनशील असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. 

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सुरू असून वाद वैयक्तिक पातळीवर गेले आहेत. त्यामुळे दोघा नेत्यांनी संयम ठेवावे. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून दोनी नेत्यांनी बोलताना संयम ठेवावा कुणी आरे केले तर दुसरा कारे करेल, त्यामुळे सामाजिक जीवनात वागताना तारतम्य  ठेवणे महत्त्वाचे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे हा ज्याचा त्याचा  प्रश्न असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. राज्यातील महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. निवडणुका ह्या प्रशासकीय बाब असून याचा कोणी काही अर्थ काढू नये जो तो पक्ष याचा आपल्यासाठी सोयस्कर पद्धतीने अर्थ काढत असतो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलAaditya Thackerayआदित्य ठाकरेPoliticsराजकारण