शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

महाकाय ‘सरदार’ची पातळी यंदा प्रथमच शिखरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 11:57 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाची उंची पुर्ण झाल्यानंतर या वर्षी प्रथमच या ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाची उंची पुर्ण झाल्यानंतर या वर्षी प्रथमच या प्रकल्पात सर्वाधिक म्हणजे 132 मिटर्पयत पाण्याची पातळी गेली आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील पुनर्वसन बाकी असल्याने या पाण्यामुळे अनेक घरे बुडीताखाली येत असल्याने प्रकल्पात पाणीसाठा कमी ठेवण्याचा निर्णय घ्यावा या आशयाचे पत्र नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. या पाण्यामुळे सध्या नंदुरबार जिल्ह्यातील बामणी गावातील चार घरांमध्ये पाणी शिरले आहे.सरदार सरोवर प्रकल्पाची उंची, त्यामुळे निर्माण झालेल्या पुनर्वसनाचा प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न या बाबीमुळे गेल्या पाच दशकांपासून हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. पुनर्वसनाबाबत नर्मदा बचाव आंदोलनाच्या तक्रारी असतांना या प्रकल्पाची 138.68 मिटर्पयतच्या उंचीचे काम दोन वर्षापूर्वीच झाले आहे. तथापी प्रकल्पाचे काम पुर्ण झाल्यानंतर गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने या प्रकल्पात जेमतेम 120 मिटर्पयत पाणीसाठा झाला होता. प्रकल्पाचे काम सुरू असतांनाही गेल्या 20 वर्षात नर्मदेला आलेल्या पुरांमुळे या ठिकाणी पाण्याची पातळी 127 व 129  मिटर्पयत यापूर्वी पोहचली होती. प्रकल्पाचे पुर्ण बांधकाम झाल्यानंतर यावर्षी प्रथमच या प्रकल्पात 132 मिटर्पयत पाण्याची पातळी गेली आहे. जी आजवर सर्वोच्च पातळी आहे. गेल्या आठवडय़ात मध्यप्रदेशातील धरणांमधून पाणी सोडल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु पुन्हा पाण्याची पातळी नियंत्रीत करण्याची कार्यवाही होत आहे. सध्याच्या पाण्याच्या पातळीमुळे मध्यप्रदेशातील काही गावांमध्ये पुर स्थिती आहे. महाराष्ट्रातीलही काही कुटूंब अजून नर्मदा काठावरच वास्तव्यास असल्याने बामणी, ता.अक्कलकुवा येथील चार घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच काही घरांना टापू स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी अजून वाढली तर अनेकांची घरे बुडीताखाली येणार असून जिवीत व वित्तीय हानीचाही धोका आहे. या पाश्र्वभुमीवर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून नर्मदेचे पुनर्वसन बाकी असतांना धरणात पुर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे म्हणजे बाधीतांवर अन्याय कारक आहे. यापूर्वीच नर्मदा प्राधिकरणाने पुनर्वसनाबाबतचे निर्णय स्पष्ट केल्यानंतरही त्यानुसार काम झालेले नाही.  बाधीतांच्या आयुष्याशी हा खेळ सुरू आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे संवेदनशीलपणे पाहून बाधीतांचे प्रश्न सोडवावे व पुनर्वसन होईर्पयत सरदार सरोवर प्रकल्पात 122 ते 127 मिटर्पयतच पाणीसाठा करावा.