शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाकाय ‘सरदार’ची पातळी यंदा प्रथमच शिखरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 11:57 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाची उंची पुर्ण झाल्यानंतर या वर्षी प्रथमच या ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाची उंची पुर्ण झाल्यानंतर या वर्षी प्रथमच या प्रकल्पात सर्वाधिक म्हणजे 132 मिटर्पयत पाण्याची पातळी गेली आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील पुनर्वसन बाकी असल्याने या पाण्यामुळे अनेक घरे बुडीताखाली येत असल्याने प्रकल्पात पाणीसाठा कमी ठेवण्याचा निर्णय घ्यावा या आशयाचे पत्र नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. या पाण्यामुळे सध्या नंदुरबार जिल्ह्यातील बामणी गावातील चार घरांमध्ये पाणी शिरले आहे.सरदार सरोवर प्रकल्पाची उंची, त्यामुळे निर्माण झालेल्या पुनर्वसनाचा प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न या बाबीमुळे गेल्या पाच दशकांपासून हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. पुनर्वसनाबाबत नर्मदा बचाव आंदोलनाच्या तक्रारी असतांना या प्रकल्पाची 138.68 मिटर्पयतच्या उंचीचे काम दोन वर्षापूर्वीच झाले आहे. तथापी प्रकल्पाचे काम पुर्ण झाल्यानंतर गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने या प्रकल्पात जेमतेम 120 मिटर्पयत पाणीसाठा झाला होता. प्रकल्पाचे काम सुरू असतांनाही गेल्या 20 वर्षात नर्मदेला आलेल्या पुरांमुळे या ठिकाणी पाण्याची पातळी 127 व 129  मिटर्पयत यापूर्वी पोहचली होती. प्रकल्पाचे पुर्ण बांधकाम झाल्यानंतर यावर्षी प्रथमच या प्रकल्पात 132 मिटर्पयत पाण्याची पातळी गेली आहे. जी आजवर सर्वोच्च पातळी आहे. गेल्या आठवडय़ात मध्यप्रदेशातील धरणांमधून पाणी सोडल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु पुन्हा पाण्याची पातळी नियंत्रीत करण्याची कार्यवाही होत आहे. सध्याच्या पाण्याच्या पातळीमुळे मध्यप्रदेशातील काही गावांमध्ये पुर स्थिती आहे. महाराष्ट्रातीलही काही कुटूंब अजून नर्मदा काठावरच वास्तव्यास असल्याने बामणी, ता.अक्कलकुवा येथील चार घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच काही घरांना टापू स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी अजून वाढली तर अनेकांची घरे बुडीताखाली येणार असून जिवीत व वित्तीय हानीचाही धोका आहे. या पाश्र्वभुमीवर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून नर्मदेचे पुनर्वसन बाकी असतांना धरणात पुर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे म्हणजे बाधीतांवर अन्याय कारक आहे. यापूर्वीच नर्मदा प्राधिकरणाने पुनर्वसनाबाबतचे निर्णय स्पष्ट केल्यानंतरही त्यानुसार काम झालेले नाही.  बाधीतांच्या आयुष्याशी हा खेळ सुरू आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे संवेदनशीलपणे पाहून बाधीतांचे प्रश्न सोडवावे व पुनर्वसन होईर्पयत सरदार सरोवर प्रकल्पात 122 ते 127 मिटर्पयतच पाणीसाठा करावा.