शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

रिक्त जागांच्या अनुशेषावर लक्ष केंद्रीत : अनुसूचित जमाती कल्याण समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:44 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तीन दिवसांपासून तळ ठोकुन असलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समिती शनिवारी रवाना होताच जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेषचा मोठा प्रश्न असून तो दूर करण्यासाठी समिती काही शिफारशी करणार असल्याचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांनी स्पष्ट केले. विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरुवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तीन दिवसांपासून तळ ठोकुन असलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समिती शनिवारी रवाना होताच जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेषचा मोठा प्रश्न असून तो दूर करण्यासाठी समिती काही शिफारशी करणार असल्याचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांनी स्पष्ट केले. विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरुवारपासून जिल्ह्यात दाखल झाली होती. 15 सदस्यीय समिती होती. त्यापैकी 11 सदस्य दाखल झाले होते. त्यात समिती अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांच्यासह आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा,  आमदार संतोष टारफे, आमदार पास्कल धनारे, आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार वैभव पिचड, आमदार पांडुरंग वरोरा, आमदार आनंद ठाकुर यांचा समावेश होता.समितीने पहिल्या दिवशी दिवसभर विविध विभागांचा आढावा घेतला. दुस:या दिवशी जिल्ह्यातील विविध 42 ठिकाणी समितीने भेटी दिल्या. काही ठिकाणी समितीसमोर समस्यांचा पाढा वाचण्यात आला तर काही ठिकाणी समितीला विविध बाबी प्रकर्षाने आढळून आल्या. रिक्त पदांचा अनुशेषजिल्ह्यात पेसा कायदा लागू आहे. पेसा कायद्याअंतर्गत रिक्त जागा सहसा ठेवता येत नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात तरी किमान समायोजन करावे लागते. परंतु ते देखील होत नसल्याची स्थिती जिल्ह्यात आहे. जिल्हाधिका:यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात वेळोवेळी शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत परंतु त्यावरही कार्यवाही होत नसल्याची स्थिती आहे. ही बाब समितीसमोर प्रकर्षाने मांडण्यात आली. समितीने देखील बारकाईने माहिती घेत कुठल्या विभागात किती जागांचा अनुशेष आहे. त्या का भरल्या गेल्या नाहीत. त्या भरण्यासाठी काय प्रय} झाले याचा आढावा घेतला.समितीचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांशी अनौपचारिक बोलतांना रिक्त पदांचा अनुशेष भरून काढणे आवश्यक असल्याचे सांगितले. समितीने केलेल्या अभ्यासानुसार आता अहवाल तयार करून तो शासनाकडे सोपविला जाणार आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल असे अपेक्षीत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा आदिवासी व दुर्गम असला तरी येथील कामे चांगली आहेत. काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रय} झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.