शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
2
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
3
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
4
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
5
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
6
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
7
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
8
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
9
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
10
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
11
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
12
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
13
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
14
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
15
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
16
"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
17
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
18
इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
19
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
20
प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?

पक्षांतराच्या राजकारणाला जिल्ह्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 10:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीपूर्वीच व निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी         ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीपूर्वीच व निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी              पक्षांतर केल्याने कार्यकत्र्यामध्ये संभ्रमीत वातावरण निर्माण झाले  होते. तथापि, पक्षांतर करणा:या नेत्यांना मात्र निवडणुकीत यश मिळाले नाही.निवडणूक जाहीर होण्यापूर्वी नवापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवापूर मतदारसंघात भजपचा प्रभाव यापूर्वी फारसा नव्हता. त्यामुळे भरत गावीत यांच्या रुपाने पक्षाला सक्षम उमेदवार मिळाला होता. परंतु निवडणुकीत मात्र त्यांना यश मिळाले नाही. आतार्पयतच्या विधानसभा निवडणुकीत भरत गावीत यांना  अर्थात भाजपला याठिकाणी सर्वाधिक मते मिळाली पण विजय गाठता आला नाही. त्यामुळे याठिकाणी पक्षांतराच्या राजकारणाला अपयशच आले.माजी आमदार उदेसिंग पाडवी यांना भाजपने या वेळी उमेदवारी नाकारली. ते शहादा मतदारसंघातून पुन्हा भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु त्यांच्याऐवजी पक्षाने त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले उदेसिंग            पाडवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व आपला मतदारसंघ सोडून नंदुरबार मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी केली. याठिकाणी भाजपचे डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देऊन काँग्रेसने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेसच्या या प्रयत्नालाही यश लाभले नाही.माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनीदेखील ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे शिवसेनेची जिल्ह्यातील एकमेव जागा असलेल्या अक्कलकुवा येथे पक्षाला फायदा होईल, असे गृहीत मानले जात होते. रघुवंशी यांनीदेखील अक्कलकुवा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे प्रतिष्ठापणाला लावली होती. परंतु त्यांच्या प्रतिष्ठेला यश मिळाले नाही. मात्र शिवसेनेला अक्कलकुव्यात इतिहासात प्रथमच सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नंदुरबार येथे भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांना युतीमुळे फायदा झाला पण अक्कलकुव्यात मात्र पक्षाच्या उमेदवाराला यशार्पयत ते पोहचवू शकले नाहीत. आता भविष्याच्या राजकीय वाटचालीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.