शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पक्षांतराच्या राजकारणाला जिल्ह्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 10:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीपूर्वीच व निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी         ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीपूर्वीच व निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी              पक्षांतर केल्याने कार्यकत्र्यामध्ये संभ्रमीत वातावरण निर्माण झाले  होते. तथापि, पक्षांतर करणा:या नेत्यांना मात्र निवडणुकीत यश मिळाले नाही.निवडणूक जाहीर होण्यापूर्वी नवापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवापूर मतदारसंघात भजपचा प्रभाव यापूर्वी फारसा नव्हता. त्यामुळे भरत गावीत यांच्या रुपाने पक्षाला सक्षम उमेदवार मिळाला होता. परंतु निवडणुकीत मात्र त्यांना यश मिळाले नाही. आतार्पयतच्या विधानसभा निवडणुकीत भरत गावीत यांना  अर्थात भाजपला याठिकाणी सर्वाधिक मते मिळाली पण विजय गाठता आला नाही. त्यामुळे याठिकाणी पक्षांतराच्या राजकारणाला अपयशच आले.माजी आमदार उदेसिंग पाडवी यांना भाजपने या वेळी उमेदवारी नाकारली. ते शहादा मतदारसंघातून पुन्हा भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु त्यांच्याऐवजी पक्षाने त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले उदेसिंग            पाडवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व आपला मतदारसंघ सोडून नंदुरबार मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी केली. याठिकाणी भाजपचे डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देऊन काँग्रेसने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेसच्या या प्रयत्नालाही यश लाभले नाही.माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनीदेखील ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे शिवसेनेची जिल्ह्यातील एकमेव जागा असलेल्या अक्कलकुवा येथे पक्षाला फायदा होईल, असे गृहीत मानले जात होते. रघुवंशी यांनीदेखील अक्कलकुवा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे प्रतिष्ठापणाला लावली होती. परंतु त्यांच्या प्रतिष्ठेला यश मिळाले नाही. मात्र शिवसेनेला अक्कलकुव्यात इतिहासात प्रथमच सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नंदुरबार येथे भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांना युतीमुळे फायदा झाला पण अक्कलकुव्यात मात्र पक्षाच्या उमेदवाराला यशार्पयत ते पोहचवू शकले नाहीत. आता भविष्याच्या राजकीय वाटचालीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.