शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका बदलताच राजकारणाचे समीकरणेही बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:53 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या आठ महिन्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या आठ महिन्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असून या तिन्ही निवडणुकांत जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे तीनवेळा बदलताना जिल्ह्यातील जनतेला अनुभव येत आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या पक्ष बदल इतका गुंतागुंतीचा झाला की दुसऱ्या फळीचे कार्यकर्ते कुठल्या पक्षात आहेत हे जाणकार नेत्यांनाही ओळखणे अवघड झाले आहे.गेल्या तीन-चार दशकांत राजकारणातील अनेक स्थित्यंतरे लोकांनी अनुभवले असले तरी गेल्या आठ महिन्यात राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे जे स्थित्यंतर झाले ते खरोखरच जुन्या पिढीतील लोकांसाठी धक्कादायक असेच आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गेल्या आठ महिन्यातील राजकीय चित्र पाहता लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगळी होती. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होती. त्यात भाजपने लाखापेक्षा अधिक मतांनी निवडणूक जिंकली असली तरी दोन्ही पक्षातील चुरस मोठी होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र राजकारण वेगळेच पहायला मिळाले. अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी पक्ष बदल केल्याने राजकीय समीकरणे बदलली. अर्थात नेते आणि कार्यकर्त्यांच्या दलबदल झाले असले तरी निकाल मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेस आणि भाजपसाठी समसमान राहिला. पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसणार आहे. नेत्यांच्या पक्ष बदलामुळे जिल्ह्यातील सत्तेचेही केंद्रीकरण झाले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर पकड असलेला नेता आज दिसून येत नाही. चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेस सोडल्यामुळे काँग्रेसची पूर्ण जिल्ह्यावरील पकड राहिली नाही. दुसरीकडे रघुवंशी यांनी जरी शिवसेनेत प्रवेश केला तरी शिवसेनेचा जिल्ह्यातील सर्वच भागात प्रभाव नसल्याने त्याचाही परिणाम राजकारणावर दिसून येतो. डॉ.विजयकुमार गावीत यांचे काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत असताना संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा वैयक्तिक प्रभाव होता. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये देखील गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यांच्या नेतृत्वाला देखील मर्यादा आल्या आहेत.अशा स्थितीत आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा दुसºया फळीतील कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी किंवा इतर पक्षांतर्गत वादामुळे पक्षांतर केले आहे. त्यात विशेषत: जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील यांचा समावेश आहे. ते गेल्या जि.प.च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे विजयी झाले होते. त्यानंतर मात्र त्यांचा जिल्ह्यातील राजकारणात भाजप जवळ सोयरीक राहिली. त्यांचे वडील मोतीलाल पाटील हे शहाद्याचे नगराध्यक्ष झाल्यानंतर भाजपची सूत्रे त्यांच्याचकडे होती. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा सक्रीय प्रचार केला. आता मात्र त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. केवळ त्यांनीच नव्हे तर त्यांच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांनीही काँग्रेसतर्फे उमेदवारी भरली आहे. अशा अनेक कार्यकर्त्यांनी दलबदल केल्यामुळे कोण कुठल्या पक्षातर्फे निवडणूक लढवीत आहे हे चेहºयावरुन ओळखणे राजकारणा-तील जाणका-रांनाही अवघड झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी होईल, अशी काही कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु त्यासाठी कुणीही फारसा पुढाकार न घेतल्याने शिवाय नेत्यांचेही अंतर्गत सोयीच्या राजकारणाची भूमिका असल्याने ती आघाडी होऊ शकली नाही. भाजपने सर्वच ठिकाणी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या वेळी बहुतांश गटात तिरंगी आणि चौरंगी लढती पहायला मिळणार आहेत.एकूणच या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाची सत्ता येईल, असे चित्र आज तरी नाही. नेत्यांनाही त्याबाबत खात्री असल्याने निवडणुकीच्या निकालानंतरच आघाडी आणि गट-तट जोडणीचे राजकारण करण्याची नेत्यांची भूमिका असल्याचे चित्र आहे.