महिला कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST2021-07-28T04:32:04+5:302021-07-28T04:32:04+5:30
तळोदा : नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांशी अरेरावी करणाऱ्या धडगाव येथील तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात, यावी ...

महिला कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाईची मागणी
तळोदा : नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांशी अरेरावी करणाऱ्या धडगाव येथील तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात, यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत शहादा येथील उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांना नर्मदा बचाव आंदोलनांच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, धडगाव तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी सुमित्रा साळवे यांनी नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते हे २६ जुलै २०२१ रोजी शेतकरी आंदोलनाच्या समथनार्थ पत्र देणेकामी तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी मच्छिमार संस्था स्थापन करण्याबाबत नमगव्हाण गावाची लोकसंख्येचे आवश्यक असलेले प्रमाणपत्रावर काय कार्यवाही केली हे विचारले असता तहसीलदारांनी महसूल कर्मचाऱ्यांना बोलवून गावाचा लोकसंख्येचा दाखला तयार करून घ्यावा अशी सूचना साळवे यांना केली. त्यावर साळवे यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा करून अर्जंट कागदपत्र मिळणार नाही. केव्हाही मागतात शिवाय चढ्या रागाने कार्यकर्त्यांना धमकावले होते. एवढेच नव्हे कार्यकर्ते चेतन साळवे यांना जास्त बोलले तर तुमच्या थोबाडीत वाजवून देईल असा सज्जड दमदेखील भरला होता. त्यांची अशी अरेरावीची भाषा खुद तहसीलदारांसमोरच घडली आहे. या सर्व गोष्टी शासकीय कर्मचाऱ्यांना अशोभनीय असल्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशा पद्धतीने एका प्रतिष्ठित आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने सदर महसूल कर्मचारी साळवे यांच्यावर तातडीने कारवाई करावी. यापूर्वीही नर्मदा बचाव आंदोलनाकडे त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. त्या लोकांशी अर्वाच्च बोलतात, कामासाठी येणाऱ्यांना हाकलून लावतात, कामे करत नाही, कागदपत्रे फेकून देतात, अश्या प्रकारच्या तक्रारी आल्या. त्यामुळे साळवे यांची चौकशी करून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा नर्मदा बचाव आंदोलन विस्थापितांसह तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर मोवाऱ्या वसावे, निमजी वसावे, वसंत वसावे, दिनेश वसावे, काल्या वसावे, रविता वसावे, आदींच्या सह्या आहेत. दरम्यान या आशयाचे निवेदन तळोदा व धडगाव येथील तहसीलदारांनादेखील देण्यात आले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.