नेत्रंग ते शेवाळी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:25+5:302021-02-05T08:07:25+5:30
वाण्याविहीर : बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी दरम्यानच्या शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरून अंकलेश्वर येथून अवजड ...

नेत्रंग ते शेवाळी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची मागणी
वाण्याविहीर : बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी दरम्यानच्या शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरून अंकलेश्वर येथून अवजड मशिनरी घेऊन येे-जा करणाऱ्या कंटेनर्ससह इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी अनुसूचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. नेत्रंग ते शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गाला तळोद्यापासून बऱ्हाणपूर-अंकलेश्वर आंतरराज्य महामार्ग असल्याने, हा राष्ट्रीय महामार्ग निजामपूर, छडवेल, नंदुरबार, तळोदा, वाण्याविहीर, अक्कलकुवा, खापर, सेलंबा, डेडियापाडा व नेत्रंग असा जातो. तळोदा ते गव्हाली दरम्यान गुजरात राज्यातून मध्यप्रदेशात जाण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय सोयीचा व जवळचा आहे. त्यामुळे दररोज या महामार्गावरून हजारो अवजड वाहनांची ये-जा असते. मात्र, या महामार्गाची रूंदी महाराष्ट्रात फक्त सात मीटर कमी असल्याने व अंकलेश्वर जी. आय. डी. सी.ला ये-जा करणाऱ्या कंटेनरसह अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. सात मीटरचा हा रस्ता रूंदीला कमी पडत असल्याने मोठे गैरसोयीचे व त्रासदायक झाल्याने शेवाळी ते नेत्रंग राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे. या रस्त्याची रूंदी सात मीटरवरून १४ मीटर झाल्यास सोयीचा होऊन रस्त्यावरील अपघाताची संख्याही कमी होणार आहे. त्यामुळे या मार्गाचे तातडीने चौपदरीकरण करण्याची मागणी भाजप अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे.