शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

देवगोई घाटात आजपासून धावणार बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 1:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तब्बल चार महिन्यांपासून बंद असलेली बससेवा सुरु करण्यासाठी बांधकाम विभागाच्या सांगण्यानुसार देवगोई घाटाची परिवहन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तब्बल चार महिन्यांपासून बंद असलेली बससेवा सुरु करण्यासाठी बांधकाम विभागाच्या सांगण्यानुसार देवगोई घाटाची परिवहन महामंडळाकडून पाहणी करण्यात आली. पाहणीत बस सेवेसाठी रस्ता अनुकुल असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 13 नोव्हेंबरपासून मोलगी व धडगाव भागातील बससेवा सुरू करण्यात येणार आहे.चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरील देवगोई घाटात तब्बल 13 ठिकाणी दरडी कोसळल्या व रस्ताही वाहून गेला. शिवाय दुर्गम भागातील काही रस्त्यांचीही दुरावस्था झाली. त्यामुळे अक्कलकुवापासून मोलगी व धडगावर्पयतची बससेवा परिवहन महामंडळामार्फत बंद करण्यात आली होती. घाटातील रस्त्याची दुरुस्ती झाली असतानाही मोठी वाहतुक बससेवेसाठी रस्ता प्रतिकुलच ठरत होता. परिणामी बससेवाही बंदच ठेण्यात आली होती. त्यात अक्कलकुवा आगारामार्फत 40 तर याच मार्गावरुन धडगावर्पयत जाणारी नंदुरबार आगाराच्या दोन बसफे:या अशा एकुण 42 बसफे:या बंद होत्या. त्यात अक्कलकुवा ते मोलगी, कोठली, भगदरी, धडगाव, जमानामार्गे धडगाव, डाब, जमाना, बिजरीगव्हाण व नंदुरबार ते धडगाव आदी बसेसचा समावेश होता. अक्कलकुवा आगाराला 40 बंद बसफे:यांमधून एक लाख 60 हजाराचे दैनंदिन तर चार महिन्याच्या कालावधीत दोन कोटी पेक्षा अधिक  नुकसान सहन करावे लागल्याचे अक्कलकुवा आगारामार्फत सांगण्यात आले. बांधकाम विभागामार्फत हिरवी ङोंडी दाखविल्याशिवाय बससेवा सुरू करता येत नव्हती. सद्यस्थितीत पाऊस नसल्याने महामंडळाला बांधकाम विभागामार्फत बससेवा सुरु करण्यासाठी रस्त्याची पाहणी करण्याचे पत्र देण्यात आले. त्यानुसार महामंडळाच्या पदाधिका:यांनी अक्कलकुवा ते मोलगी व धडगावर्पयतच्या रस्त्याची पाहणी केली. त्यात रस्ता बससेवेसाठी अनुकुल असल्याचे आढळून आले. त्यामुळे महामंडळाच्या बसेस 13 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती  आगारामार्फत  सांगण्यात आले. पाहणी करताना आगारप्रमुख आर.आर.फुलपगारे, वाहतुक नियंत्रक के.एस.पराडके, वाहतुक निरीक्षक आर.बी.वळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे दुर्गम भागातील प्रवाशांना पुन्हा सुखरुप प्रवासाचे साधन उपलब्ध होणार असून जमाना मार्गावरही बस सुरू होण्याच्या शक्यता आहे.बांधकाम विभागामार्फत दवगोई घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले, परंतु त्यात मोठी कामेच झाली आहे. दुर्वरित मालीआंबा ते देवगोईर्पयतची किरकोळ कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे म्हणत परिवहन महामंडळाच्या पदाधिका:यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा किरकोळ कामांमुळेही वाहतुक अडचणीत येऊ शकते, त्यासाठी स्थानिक राजकीय पदाधिका:यांना पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दिवाळीनिमित्त धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे एकमेव यात्रा भरली. एकमेव यात्रेमुळे अस्तंबाकडे जाणा:या भाविकांची संख्या मोठी होती. ही यात्रा परिसरातील प्रवास सेवा ही बाब अक्कलकुवा आगारासाठी हक्काचीच ठरत असते. या यात्रेसाठी अक्कलकुवा आगारामार्फत प्रवाशांची गर्दी पाहून ज्यादा बसेसही सोडल्या जातात, त्यातून आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ होते, शिवाय भाविकांची देखील सोय होत असते. परंतु यंदा रस्ताच खराब झाल्यामुळे अस्तंबा भागातील बसफे:या बंद करण्यात आल्या. त्यामुळे त्या भागातील दिवाळी हंगामातील मोठय़ा उत्पन्नावर आगाराला पाणी सोडावे लागले.