शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा ‘गॅरंटी’ शब्द भाजपने चोरला : नाना पटोले यांचा आरोप

By मनोज शेलार | Updated: March 6, 2024 17:20 IST

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात येणार असून, जाहीर सभा देखील होणार आहे.

नंदुरबार :काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत वापरलेला व लोकप्रिय केलेला ‘गॅरंटी’ हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोरल्याचा आरोप करीत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले. किती वर्षे गांधी परिवाराच्या नावाने खडे फोडणार, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून नंदुरबारात पत्रकारांशी बोलताना केला. 

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात येणार असून, जाहीर सभा देखील होणार आहे. यानिमित्त आढावा घेण्यासाठी बुधवारी नाना पटोले नंदुरबारात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विकास न करता भाजप १० वर्षांपासून फक्त काँग्रेसवर टीका करण्याचे काम केले आहे. पंतप्रधान मोदी घराणेशाहीवर टीका करतात. मग त्यांच्याच पक्षातील घराणेशाही त्यांना दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित करून अमित शहा यांचा मुलगा जय शहा कधी क्रिकेट खेळल्याचे ऐकिवात नाही, असे असताना देशाच्या क्रिकेट संघटनेचा तो प्रमुख बनतो, याला काय म्हणावे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपमध्ये दम होता तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या नाहीत.

लोकसभा जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. उलट महायुतीमधील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाजपने काय हालत केली आहे, ते जनता पाहत आहे. भ्रष्ट व्यवस्थेला ताकद देण्याचे काम भाजप करीत आहे. काँग्रेसचा कर्नाटकमधील ‘गॅरंटी’ हा शब्द भाजपने चोरला आहे. मणीपूर ते मुंबई ही राहुल गांधी यांची न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असून, यात्रेचे भव्य स्वागत व्हावे, ही भूमिका जनतेची असल्याने तयारीचा आढावा घेत असल्याचे पटोले यांनी सांगितले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेस