शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

संविधान जागरसाठी दोन गावांची बार्टीकडून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत संविधान साक्षर ग्राम उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांसाठी जिल्ह्यात पातोंडा ता.नंदुरबार व नवलपूर ता. शहादा या दोन गावांची निवड करण्यात आली आहे.आगामी साजरी होणा:या संविधान दिनाच्या पाश्र्वभूमीवर बार्टीमार्फत संपूर्ण राज्यात संविधान साक्षर ग्राम हा उप्रकम हाती  घेण्यात घेण्यात आला आहे. हा उपक्रम बार्टीच्या समता विभागामार्फत राबविण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात दोन अशा एकुण 72 गावांची निवड करण्यात आली               आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यात  पातोंडा ता.नंदुरबार व नवलपूर ता.शहादा या दोन गावांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी नंदुरबार जिल्ह्यात  सात समतादूतांचे पथक कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत हे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात प्रथम गावाचा सुक्ष्म आराखडा, नकाशा तयार करीत ग्रामस्थांच्या   नियोजित बैठका घेण्यात येत आहे. त्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी  कर्मचारी व शाळा मुख्याध्यापक  यांचे सहकार्य घेतले जात आहे. पातोंडा येथे ग्रामस्थांच्या बैठका व शालेय विद्याथ्र्यासाठी जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले.  यावेळी बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी, सारिका दहिवेलकर,  मिनाक्षी दांडवेकर, मुख्याध्यापक राजीव पावरा यांच्या जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.उपक्रमात भारतीय राज्यघटनेचे महत्व, अंमलबजावणी,  कायदे याविषयी माहिती दिली जात आहे.  स्थानिक अधिका:यांच्या  बैठका घेत 100 टक्के संविधान साक्षरतेची गरज, प्रचार, प्रसार या विषयावर चर्चात्मक आराखडा  तयार करण्यात येत आहे. युवा वर्ग बचत गटातील महिला, शेतकरी गट, विविध मंडळ यांच्यासमोर संविधान साक्षरतेची संकल्पना स्पष्ट करीत विद्याथ्र्यासाठी हस्तकला, चित्रकला स्पर्धा. गांडूळखत प्रकल्प, परसबाग, स्वच्छतेचे महत्व सांगत रोज प्रास्तविका वाचनाची सवय लावण्याचा प्रय} करण्यात येत आहे.

महिलांसाठी घेण्यात येणा:या कार्यशाळेत व्यसनमुक्ती, बचतीची सवय, आरोग्य व स्वच्छता, लेक वाचवा-लेक वाढवा या विषयावर प्रबोधन, महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवणे, महिलांसाठी आरोग्य कॅम्प आयोजित करणे. ग्राम स्वच्छता अभियान राबविणे, विविध स्पर्धा  घे:यात येत आहे.4युवक-युवतींसाठीच्या कार्यशाळेत भारतीय संविधान व मुलभूत अधिकार या विषयावर शासकीय अधिकारी व प्रत्येक घरात राज्यघटना देणे राज्यघटनेची प्रास्ताविका भिंतीवर लावणे, शाळेत भारतीय संविधानाची प्रास्ताविका लावणे, नियमित वाचन घेणे, संविधान उद्देशिपत्रिकेची कोनशीला तयार करणे असे काही उपक्रम राबविण्यात येत आहे.