पुन्हा आठ अहवाल पॅाझिटिव्ह, तीन लाख २८ हजार कोंबड्या केल्या नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:48+5:302021-02-11T04:33:48+5:30
उप शिक्षण अधिकारी डॉ.युनूस पठाण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस ...

पुन्हा आठ अहवाल पॅाझिटिव्ह, तीन लाख २८ हजार कोंबड्या केल्या नष्ट
उप शिक्षण अधिकारी डॉ.युनूस पठाण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस निरीक्षक नासिर पठाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत वसावे आदी सर्व अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या परिस्थितीची पाहणी करीत माहिती जाणून घेत आहेत. पोल्ट्री परिसरात बंदोबस्तासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
आमदार शिरीषकुमार नाईक यांची पाहणी
आमदार शिरिषकुमार नाईक यांनी बर्ड फ्लू भागातील पालावाला पोल्ट्रीत पाहणी केली किती कुकुट पक्षी आहेत, अंडी किती आहेत, पशुखाद्य किती अशी चौकशी करून नुकसान झालेल्या व्यावसायिकांची समस्या जाणून घेतली. नवापूर शहरातील पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यासंदर्भात विधानसभेत नुकसान भरपाई संदर्भात प्रश्न उपस्थित केला जाईल, पशुसंवर्धन मंत्र्याशी चर्चा करून तत्काळ मदत निधीत मिळावी यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आमदार शिरिषकुमार नाईक यांनी दिली.
२७ पोल्ट्री मधील पशुखाद्य गोडाऊन सील
नवापुर तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत २७ पोल्ट्रीमधील पशुखाद्याची मोजमाप व पंचनामा करून पशुखाद्य गोडाऊनमध्ये सील करण्याची कामगिरी करण्यात आली आहे. नवापूर शहरातील मोठ्या पोल्ट्रीमध्ये पशुखाद्याची निर्मिती केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पशुखाद्य पोल्ट्री फार्म मध्ये दिसून येत आहे. यात मका, सोयाबीन ढेप, शिंग ढेप, ज्वारी या पासून पोल्ट्री व्यवसायिकांनी आधुनिक मशिनरी च्या सहाय्याने पशुखाद्य तयार केले जाते. व्यवसायिकांनी पशुखाद्य नष्ट न करता त्याला ९० दिवसांपर्यंत सील करून ठेवावे त्यामुळे शासनाचे व व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. बुधवारी प्रशासनाने तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मचे कोंबडी खाद्याचे गोडावून सील केले.
मजुरांची काळजी घ्यावी
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार किलिंग ऑपरेशन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, परंतु काही पोल्ट्रीधारकांनी जेसीपीने खड्डा करत असताना अर्धवट खड्डा करून कोंबड्या पुरवण्याचे काम दिसून येत आहे. काही ठिकाणी खाजगी कामगारांकडून काम केले जात आहे परंतु काहीचा तोंडाला मास्क नसल्याने त्याचा परिणाम मजुरांचा आरोग्यावर होऊ शकतो. याबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.