20 हजार शेतक:यांच्या शेतीचे अतीवृष्टीत नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:04 IST2019-08-19T12:03:55+5:302019-08-19T12:04:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे 20 हजार शेतकरी बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांच्या अहवालातून समोर ...

20 thousand farmers: the loss of their livestock farming | 20 हजार शेतक:यांच्या शेतीचे अतीवृष्टीत नुकसान

20 हजार शेतक:यांच्या शेतीचे अतीवृष्टीत नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे 20 हजार शेतकरी बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांच्या अहवालातून समोर आली आह़े नदी-नाल्यांच्या पुराचे पाणी शेतशिवारात शिरल्याने 12 हजार हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाल्याने ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आह़े    
7 ते 10 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होऊन नदी-नाल्यांना पूर आले होत़े पुरामुळे कोरडवाहू, बागायत आणि बारमाही शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होऊन अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या होत्या़ महसूल विभागाकडून घर, पशुधन आणि मनुष्यहानीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन बाधितांना भरपाई तात्काळ देण्यात आली होती़ यानंतर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतजमिनींच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले होत़े यांतर्गत आजअखेरीस 7 हजार 820 कोरड, 4 हजार 298 बागायती आणि 2 हजार 99 हेक्टर क्षेत्रातील बारमाही अशी एकूण 12 हजार हेक्टर पिक आणि शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े पिकांचे सर्वाधिक नुकसान हे शहादा तालुक्यात झाले आह़े  जिल्ह्यात यंदा 3 लाख 1 हजार 801 हेक्टर पेरणी पूर्ण झाली होती़ एकूण 92 टक्के क्षेत्रापैकी 15 टक्के शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आह़े येत्या 15 दिवसांपेक्षा अधिक काळ महसूल आणि कृषी विभागाने नियुक्त केलेले तलाठी व कृषी सहायकांचे  पथक सर्व सहा तालुक्यात पंचनामे पूर्ण करणार आहेत़ यांतर्गत  पीक आणि जमिनीचे नुकसान पडताळणी होणार आह़े 

जिल्ह्यात एकूण 12 हजार 159़52 हेक्टर शेतजमिनीचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाले आह़े यात नंदुरबार 887, नवापुर 452, अक्कलकुवा 2 हजार 94, शहादा 6 हजार 239, तळोदा 2 हजार 300 तर धडगाव तालुक्यातील 187 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आह़े  
जमिन क्षेत्राची मालकी असलेले 20 हजार 237 शेतकरी अतीवृष्टीमुळे बाधित झाल्याचे कृषी विभागाच्या पंचनाम्यात म्हटले आह़े यात नंदुरबार 1 हजार 506, नवापुर 753, अक्कलकुवा 4 हजार 192, शहादा तालुक्यात 9  हजार 360, तळोदा 4 हजार 216 तर धडगाव तालुक्यातील 210 शेतक:यांचा समावेश आह़े 
कोरडवाहू जमिन असलेल्या 12 हजार 991 शेतक:यांच्या 7 हजार 820 हेक्टर जमिन आणि पिकांचे नुकसान झाले आह़े यात नंदुरबार  894, नवापुर 609, अक्कलकुवा 3 हजार 320, शहादा 5 हजार 619, तळोदा 2 हजार 339 तर धडगाव तालुक्यातील 210 शेतक:यांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आह़े दोन हेक्टरपेक्षा कमी आणि अधिक अशा क्षेत्रात नुकसानीचा आढावा घेत पंचनामे करण्यात आले आहेत़ हा अहवाल पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे देण्यात येणार आह़े 

जिल्ह्यातील 7 हजार 164 शेतक:यांच्या 4 हजार 298 हेक्टर बागायती पिके आणि शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े नंदुरबार तालुक्यात 571 शेतक:यांचे 341 हेक्टर, नवापुर 125 शेतक:यांचे 58, अक्कलकुवा 850 शेतक:यांचे 441, शहादा 3 हजार 741 शेतक:यांच्या 2 हजार 494 तर  तळोदा तालुक्यातील 1 हजार 877 शेतक:यांच्या 966 हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याची माहिती आह़े सर्वाधिक बागायती पिकांचे नुकसान शहादा तालुक्यात झाले आह़े 
 

Web Title: 20 thousand farmers: the loss of their livestock farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.