शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

बेरोजगारीवर मात करी, सहकारी भाजीपाला लॉरी ! 14 युवकांनी शोधला आर्थिक उन्नतीचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 10:31 AM

सुरत येथील बाजारात माल घेऊन गेलो. मात्र, तेथे मालाची आवक वाढली की भाव पडायचे.

भूषण रामराजे/ नंदुरबार : 'सुरत येथील बाजारात माल घेऊन गेलो. मात्र, तेथे मालाची आवक वाढली की भाव पडायचे. व्यापारी मालाकडे दुर्लक्ष करायचे, आर्थिक नुकसान व्हायचं, शेवटी मग आम्हीच ठरविले आणि रस्त्यावर भाजीपाला विकला, पहिला प्रयत्न फसला, परंतु आता सहकारी भाजीपाल्याची लॉरी दौडू लागली आहे'. हे मनोगत आहे, चंदू गावीत ( रा बोकळझर, ता नवापूर, जि़ नंदुरबार) याचं नवापूर तालुक्यात फुललेल्या गटशेती चळवळीचा चंदू हा एक शिलेदार. ११५ एकरावर होणारी भेंडी शेती, काकडी, नर्सरीची गटशेती, औजार बँक यासह विविध उपक्रम तो राबवित आहे. आदिवासी युवकांमध्ये स्वाभिमान जगविण्याचं काम चंदू करत आहे़ त्यांच्या ‘सहकारी लॉरी’ची जन्मकथा ही एका नव्याच संकल्पनेची ओळख म्हणावी.

नवापूर तालुका हा तूर आणि भाताच्या विविध वाणांसाठी ओळखला जातो़ याच तालुक्यात गत १० वर्षात गटशेतीतून भाजीपाला उत्पादनाचे प्रयत्न सुरू झाले़ सुरुवातीला राज्याच्या विविध भागातील कृषी संस्थांच्या आधाराने फुललेला भाजीपाला गुजरात राज्यातील सुरत, बारडोली आणि वापी इथे जात होता. गेल्या दोन वर्षात पाऊस आणि इतर समस्यांनी गटशेतीला घेरले, गट विखुरले़ यातच चंदू गावीत हे सुरत येथे भाजीपाला विक्रीसाठी गेले असता, भाव पडल्याने भाजीपाला सोडावा लागला. या संकटातून मार्ग निघाला. सुरत येथेच भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावला. पहिल्या प्रयत्नात भेंंडी विक्री झाली़, आणि येथूनच सहकारी लॉरी सुरू करण्याची कल्पना उदयास आली.

नवापूर तालुक्यात २५ एकरात चंदू गावीत ही गटशेती करतात़ यात प्रमुख उत्पादन म्हणजे भेंडी, मेथी आणि कोथिंबीर. हा भाजीपाला घेत, सर्व १४ जणांनी बारडोली आणि परिसरात लॉरी भाड्याने घेत भाजीपाला विकला आणि उत्पादनाच्या ३० टक्के नफा मिळाला़ किरकोळ यश असले तरी त्यातून नवा मार्ग सापडला़ यातून ग्रामीण भागात १० आणि नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी व खांडबारा येथे चार मोठ्या लॉरी आणि त्याला दिवसभर भाजीपाला आणून देणारे वाहन याची जोड दिली. आजघडीस नवापूर तालुक्यात सुरू असलेल्या १५ लॉरींवर दर दिवशी एक क्विंटल भाजीपाला विक्री केला जातो़ केवळ स्वत: पिकवलेला भाजीपाला विक्री करून यश मिळणार नाही, हे जाणून गावीत व त्यांचे सहकारी इतर शेतक-यांसोबत संपर्क साधून त्यांचा भाजीपाला खरेदी करतात.

शेतक-यांना कोणत्याही प्रकारे वाहतूक खर्च, मार्केट फी, आडत कमिशन द्यावे लागत नाही. दर दिवशी १५ लॉरींवर किमान १० प्रकारच्या भाज्यांची विक्री झाली पाहिजे असे टार्गेट ठेवून काम केले जात आहे़ आलेला पैैसा एकत्र करून तो बँकेत भरला जातो. महिन्याच्या १ तारखेला उत्पादन खर्च वजा जाता मिळालेला नफा सर्वांमध्ये वाटला जातो, अगदी साध्यासोप्या आणि सरळ अशा व्यवहारामुळे महिन्याकाठी प्रत्येकाच्या गाठीला २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम हाती पडत असते.

भेंडी आणि काकडीतून आर्थिक स्थैैर्याकडे- चंदू गावीत याच्यासोबतच हिरामण वळवी, वीरसिंग कोकणी, होबील गावीत, शंकर गावीत, जालमसिंग गावीत, वीरसिंग गावीत, वेच्या गावीत, नीलेश गावीत, दिनकर गावीत, बाबू गावीत, जिवल्या गावीत, आरसीगावीत हे १४ सहकारी लॉरीच्या प्रयोगात सातत्याने राबत आहेत.

- २५ एकर क्षेत्रात सध्या उत्पादन येत असलेल्या भेंडीला ७० हजारांपर्यंत एकरी खर्च येतो़ गेल्या दोन महिन्यात १०० क्विंटलपेक्षा अधिक भेंडी विकून एकरी १ लाखाचा खर्च त्यांनी वसूल केला आहे़ अद्यापही भेंडी विक्री सुरू आहे़ दारोदार फिरून का होईना उत्पादन येणार, असा ठाम विश्वास असल्याने प्रत्येक जण नेमून दिलेल्या गावातील लॉरीवर सकाळी आठ वाजता पोहोचत आहे.

- गेल्या वर्षी सहकारी लॉरीतून युवकांनी १५ गुंठ्यात लागवड केलेली काकडी विकली होती़ ५५ हजार रुपये एकरी खर्च असलेल्या काकडीचे १८ टन उत्पादन आले. यातून एक लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न तीन महिन्यांपर्यंत मिळत होते.

- शेतक-यांचा भाजीपाला थेट ग्राहकाच्या घरात ही संकल्पना रूढ करण्याचा प्रयत्न करणा-या या युवकांनी भाजीपाला पेरणीसाठीचा खर्चही स्वत:च घरातून उभा केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या