शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

पुण्याहून परतलेल्या तरुण दाम्पत्याला घरच्यांनीही नाकारले; ग्रामस्थांनी हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 3:38 PM

व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य पुणे येथे राहावयास गेले होते. तथापि, कोरोनामुळे गावाची ओढ त्यांना लागली. १८ मे रोजी हे दाम्पत्य कोल्हेबोरगाव येथे आले.

ठळक मुद्देपिण्याचे पाणीही कुणी दिले नाहीकोल्हेबोरगाव येथील घटना

बिलोली  (जि. नांदेड) : लॉकडाऊनमुळे  बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील दाम्पत्य पुणे येथून गावात परतले. मात्र, त्यांना घेण्यासाठी घरच्यांनी नकार दिला. गावकऱ्यांनीही तिरस्कार केला. पिण्यासाठी पाणीही दिले नाही, असा भीषण प्रसंग त्यांच्यावर ओढवला.

व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य पुणे येथे राहावयास गेले होते. तथापि, कोरोनामुळे गावाची ओढ त्यांना लागली. १८ मे रोजी हे दाम्पत्य कोल्हेबोरगाव येथे आले. त्यावेळी कटू प्रसंगाना तोंड द्यावे लागले. आपल्या संसाराचे गाठोड डोक्यावर घेऊन पत्नीसह तब्बल तीन तास त्यांना रखरखत्या उन्हात ताटकळत उन्हात उभे राहावे लागले. भुकेने व्याकूळ, तहानेने त्रासून गेलेल्या या दाम्पत्याच्या मदतीला ना रक्ताची नाती कामी आली, ना प्रशासन. घरच्या मंडळींसह ग्रामस्थांनी नाकारल्याने तरुण दाम्पत्याने कंधार तालुक्यातील रुई गावच्या माळरानात छोटी झोपडी टाकून तात्पुरता आधार घेतला आहे.  उपाशीपोटी दिवस काढण्याची वेळ आमच्यावर आली असून आयुष्यात कधीच न विसरणारा हा प्रसंग असल्याची प्रतिक्रिया दाम्पत्याने दिली. बिलोली तालुका प्रशासनाने जिल्हाबाहेरुन आलेल्या मजुरांसाठी शाळा, समाजमंदिर व गावाबाहेर क्वारंटाईन करुन ग्रामस्तरावर देखरेख समिती स्थापन केल्याचे सांगून स्वत:चा उदो-उदो करुन घेतला  खरा. प्रत्यक्षात कोल्हे बोरगाव येथे असे काहीच नसल्याचे भयावह चित्र या दाम्पत्यामुळे समोर आले. या दाम्पत्याला प्रशासनाने न्याय मिळवून देण्याची मागणी आता होत आहे.

उपाशीपोटी दिवस काढत आहोत गावकऱ्यांनी आमचा तिरस्कार केला... पाणीही दिले नाही... पत्नीसोबत शाळेत राहावयास तयार असताना शाळाही देण्यात आली नाही. रखरखत्या उन्हात आम्हाला गावाबाहेर काढण्यात आले आहे. आम्ही कंधार तालुक्यातील रुई गावच्या माळरानावर उपाशीपोटी दिवस काढत आहोत - काशीनाथ मानेमोड, स्वाती मानेमोड,  दाम्पत्य, कोल्हेबोरगाव ता. बिलोली.

क्वारंटाईनची सोय नाही सद्य:स्थितीत गावात घराव्यतिक्ति कसल्याच प्रकारची क्वारंटाईनची सोय करण्यात आली नसल्याने त्या दाम्पत्यांना गावाबाहेर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. -नागोराव करेवाड, पोलीस पाटील, कोल्हेबोरगाव ता. बिलोली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस