शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

यवतमाळचे पाणी गांजेगावपर्यंत पोहचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:45 IST

गेल्या १५ दिवस बेमूदत आंदोलन केल्यानंतर मंजूर करण्यात आलेले २ दलघमी पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार यवतमाळचे पाणी गांजेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहचले़

ठळक मुद्देदोन दलघमी पाणी सोडले पळसपूर, कोपरावासियांवर पुन्हा पाणीटंचाईचे संकट

हिमायतनगर : गेल्या १५ दिवस बेमूदत आंदोलन केल्यानंतर मंजूर करण्यात आलेले २ दलघमी पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार यवतमाळचे पाणी गांजेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहचले़परंतु नांदेड जिल्ह्याचे मंजूर ७ दलघमी पाणी अद्याप बोरीच्या पुलापर्यंत देखील आले नसल्याने शेतकरी वर्गात प्रशासनाच्या धीम्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडून दिलासा द्यावा, अन्यथा शेतक-यांना पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा नदीकाठावरील शेतक-यांनी दिला आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी ही नदीकाठावरील गावक-यांची कामधेनू आहे. या नदीमध्ये गेल्या ४ महिन्यापासून पाणी नसल्यामुळे दोन्ही भागातील ९० गावच्या शेतक-यांनी आंदोलन केले होते़ त्यानंतर शासनाला जाग आली. १५ व्या दिवशी नांदेड जिल्हाधिका-यांनी ७ दलघमी आणि यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांनी ५ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरीचे पत्र आंदोलनकर्त्यांना देऊन इसापूरचे कार्यकारी अभियंता कुरुंदकर यांना तसे आदेश दिले होते़यास जवळपास ९ दिवस लोटले असून यवतमाळ जिल्ह्याचे पाणी पैनगंगा नदीच्या गांजेगाव पुलापुढे गेले असताना देखील नांदेड जिल्हाधिकारी यांनी मंजूर केलेले ७ दलघमी पाणी अद्यापही आंदोलन केलेल्या नदीपात्रात पोचले नाही. त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी यांनी मंजुरीच्या दिलेल्या पत्रानुसार पाणी सोडण्यात कुचराई केली की काय..? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ मराठवाड्याचे मंजूर पाणी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे सहस्त्रकुंड पर्यंत सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़

  • विदर्भाच्या भागातून पैनगंगा नदीपात्रात आलेले पाणी अजूनही पळसपूरपर्यंत पोहचले नाही़ दरम्यान गांजेगाव बंधा-याखालील शेतक-यांनी निवेदन देऊन गेट काढण्याची मागणी केल्याने गुरुवारी दुपारी दोन गेट काढण्यात आले आहे.

त्यामुळे पळसपूर, कोपरा वासियांना पुन्हा पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेता मराठवाड्याचे पाणी नदीपात्र सोडण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे़ त्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या तयारी आहेत़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईDamधरण