शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
4
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
5
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
6
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
7
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
8
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
9
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
10
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
11
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
12
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
13
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
14
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
15
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
16
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
17
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
18
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
19
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
20
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

सिंचनाची कामे प्राधान्याने सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:45 IST

गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : सुधा प्रकल्पाच्या उंचीसह दिवशीचा प्रश्नही लागणार मार्गी

भोकर : गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़ यापुढेही जिल्ह्यातील सिंचनाची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असून लवकरच सुधा प्रकल्पाची उंची, वाघु नदीवरील पिंपळढव प्रकल्प, दिवशी येथील साठवण तलाव आदी कामे मार्गी लागतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.तालुक्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंचनाच्या मागणीला शासनाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रावणगाव, पिंपळढव येथे बुधवारी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, जि.प. सदस्य तथा कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, जगदीश पाटील भोसीकर, उपसभापती सूर्यकांत बिल्लेवाड, गणेश राठोड, गुलाबराव चव्हाण, रामचंद्र मुसळे, बाबूराव सायाळकर, उज्ज्वल केसराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना संबंधित विभागाकडून गोदावरी खोºयात पाणी उपलब्धता नसल्याचे कारण सांगितले जात होते. यावर वेळोवेळी शासनस्तरावर बैठका घेवून बाजू मांडून पाठपुरावा करण्यात आला.तसेच गोदावरी खोºयात शंभर टक्के साठवणूक होत नाही आणि २९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो अशी भूमिका मांडली़ नियोजन आणि जलव्यवस्थापन नाशिक यांनी हे म्हणणे मान्य करीत २० जून रोजी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देवून तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्पाची १.१० मीटर उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे २ द.ल.घ.मी. पाणीसाठा वाढून १५० हेक्टर अधिक भाग सिंचनाखाली येणार आहे. तर पिंपळढव येथील वाघु नदीवरील प्रकल्पास मंजुरी मिळून १०७ चौरस किमी क्षेत्रात पाणी साठवण होवून ७०० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे तर दिवशी येथील प्रकल्पासही मंजुरी मिळाली आहे. उर्वरित पाकी येथील काळडोह साठवणतलाव व जाकापूर साठवण तलावाचाही मार्ग मोकळा झाला आहे.चव्हाण यांचा खासदार चिखलीकरांना टोलाआठ वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य झाले असून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी एका महिन्यातच याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. 'काल तूप खाल्लं आणि आज रुप आलं' असं होत नसतं, अशा शब्दात खा.चिखलीकर यांचे नाव न घेता चव्हाण यांनी त्यांना टोला लगावला. यावेळी आनंदराव पाटील, शंकरराव तोटेवाड, परमेश्वर वाघमारे, गिरीश कदम, वसंत जाधव, गंगाधर भोंबे, साईनाथ कोटुरवार आदी उपस्थित होते़माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र सरपंच व नागरिकांना दिले़ तेव्हा ग्रामस्थांनी पिंपळढव परिसरातील वाघु नदीवर साठवण तलाव होणार असल्याच्या आनंदात पेढे वाटण्यात आले़

टॅग्स :NandedनांदेडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAshok Chavanअशोक चव्हाणWaterपाणी