शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

भीमरायावानी पुढारी होईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:00 AM

नांदेड जिल्हा हा नेहमीच चळवळीचा गड राहिलेला आहे़ त्यामुळेच निवडणुकीत सर्वच पक्षांना आपल्या ध्वजासोबत निळा ध्वजही लावावा लागतो़ मात्र शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर हरिहरराव सोनुले यांनी केलेली विजयाची ऐतिहासिक नोंद वगळता गटबाजी आणि मतविभागणी यामुळे चळवळीची पिछेहाट झाली़ सध्या चळवळीतील नवी पिढी पुन्हा मोर्चेबांधणी करताना दिसते़

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्क

 नांदेड जिल्हा हा नेहमीच चळवळीचा गड राहिलेला आहे़ त्यामुळेच निवडणुकीत सर्वच पक्षांना आपल्या ध्वजासोबत निळा ध्वजही लावावा लागतो़ मात्र शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर हरिहरराव सोनुले यांनी केलेली विजयाची ऐतिहासिक नोंद वगळता गटबाजी आणि मतविभागणी यामुळे चळवळीची पिछेहाट झाली़ सध्या चळवळीतील नवी पिढी पुन्हा मोर्चेबांधणी करताना दिसते़मतदार संघ पुनर्रचनेनुसार जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ आहेत़ तर जिल्हा ३ लोकसभा मतदारसंघामध्ये विभागला गेलेला आहे़ २००९ च्या जनगणनेतील सामाजिक स्थिती पाहता जिल्ह्यात सर्वसाधारण वर्ग २२़२० टक्के, इतर मागासवर्ग २७़८५ टक्के, अनुसूचित जाती १८़९३ टक्के, अनुसूचित जमाती ६़९१ टक्के तर इतर समाज ज्याची लोकसंख्या २४़११ टक्के इतकी आहे़ जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीचा इतिहासही देदीप्यमान असल्याने केवळ नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी हा जिल्हा खुणावताना दिसतो़डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने निवडणुकीच्या राजकारणात प्रारंभी दमदार यश मिळविले होते़ १९५७ च्या निवडणुकीत फेडरेशनने ६़२३ टक्के मते मिळवित १३ जागा जिंकल्या होत्या़ त्यानंतर १९६२ च्या निवडणुकीत ३ जागांवर तर १९६७ च्या निवडणुकीत रिपाइंच्या तिकिटावर ५ जागी यश मिळविले होते़ त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातही कार्यकर्ते सक्रिय झाले होते़ नांदेड लोकसभा मतदारसंघ १९५१ ला हैदराबाद प्रांतात होता़ त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या गोविंदराम मेश्राम यांनी १५़२५ टक्के मते मिळवित चुरशीची लढत दिली होती़ मतदारसंघात मिळालेली घवघवीत मते चळवळीचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली़ त्यानंतर १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्याच हरिहरराव सोनुले यांनी २४़७१ टक्के मते मिळवित लोकसभेत प्रवेश मिळविला़ हा विजय आंबेडकरी चळवळीसाठी मैलाचा दगड ठरला़ मात्र येथूनच कार्यकर्त्यांच्या राजकीय अपेक्षा वाढल्या आणि चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांसमोर रिंगणात उभे राहू लागले़ पर्यायाने लक्षवेधी मते घेवूनही चळवळीतील कार्यकर्त्याला त्यानंतर ना विधानसभा गाठता आली, ना लोकसभा़ १९८० च्या निवडणुकीत रिपाइं गवई गटाच्या उमेदवाराला १० हजार ३७५ मतांवर समाधान मानावे लागले़ मात्र जिल्ह्यात चळवळीतील मतदारांची मजबूत व्होटबँक असल्याने प्रकाश आंबेडकरही नांदेडकडे आकर्षिले गेले़ अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना १९८७ मध्ये त्यांनी तब्बल १ लाख ७१ हजारांहून अधिक मते खेचली होती़ त्यानंतरच्या निवडणुकात भारिप, रिपाइंबरोबरच बसपा आणि इतर पक्षांचे उमेदवारही रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकत गेले़ हा सिलसिला पुढे कायम राहिला़ विधानसभा निवडणुकीतही चळवळीतील उमेदवारांनी लक्षवेधी मते खेचली़ तत्कालीन भारिपच्या सुरेश गायकवाड यांनी १९९० ला २५ हजाराहून अधिक मते खेचली तर १९९५ ला त्यांच्या पारड्यात ३३ हजार मते पडली होती़ जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातून किशोर केसराळे, गणेश राठोड, नागनाथ गित्ते यांच्यासह जाकेर चाऊस यांनीही चुरशीच्या लढती दिल्या़ मात्र त्यानंतर आर्थिक, रचनात्मक कार्यक्रमाअभावी चळवळ जोमात असूनही निवडणूक फडात मात्र कार्यकर्त्यांना फारसे यश मिळाले नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरElectionनिवडणूक