शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

मदत वाऱ्यावर, रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST

कोरोना महामारीमुळे यंदाही रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून लाॅकडाऊनच्या दुष्टचक्रात अडकलेल्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

कोरोना महामारीमुळे यंदाही रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून लाॅकडाऊनच्या दुष्टचक्रात अडकलेल्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, रिक्षाचालकांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार २० एप्रिल रोजी परिवहनमंत्र्यांनी रिक्षाचालकांना अर्थसाहाय्य देण्यासाठी रिक्षा पदाधिकारी व परिवहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्यासंबंधी नियोजन केले होते. मात्र, या घटनेला आता जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. रिक्षाचालक निधीची प्रतीक्षा करीत आहेत.

चौकट- रिक्षाचालकांच्या प्रतिक्रिया

१. मागील दोन महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने दीड हजार रुपये अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. तीसुद्धा वेळेवर दिली जात नाही. सगळेच अवघड झाले आहे. - मुखीद पठाण, पीरबुऱ्हाणनगर

२. मागील वर्षापासून ऑटोरिक्षा चालकांवर वाईट वेळ आली आहे. आमचे पोट तीन चाकावर आहे. मात्र, तेच बंद आहेत. त्यामुळे आमचे कुटुंब कसे जगवायाचे हा गंभीर प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. या काळात कोण किती मदत करणार. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी. - माणिक भालेराव, महेबूबनगर.

३. राज्यातील प्रत्येक रिक्षाचालक शासनाच्या अनुदान निधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. दुसरीकडे कर्ज घेतलेल्या रिक्षाचालकांना हप्ते कसे फेडायचे, हा प्रश्न गंभीर वाटत आहे. त्यामुळे शासनाने रिक्षाचालकांसाठी भरीव मदत करावी. - अहेमद बाबा, जिल्हाध्यक्ष, टायगर रिक्षा संघटना, नांदेड.

४. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयभीत वातावरण झाले आहे. बाहेर पडावे तर कोरोनाची भीती, घरात बसावे तर पोटाची काळजी, अशा परिस्थिती जगायचे कसे, याचा मार्ग सापडत नाही. अशा वेळी शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे. - रमेश भालेराव. तरोडा खु., नांदेड.