शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लाडक्या बहिणीला १५०० रुपये अन् सावित्रीच्या लेकीला ३२ वर्षांपासून दिवसाला १ रुपयाच भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 12:25 IST

रविवार व इतर सुट्या वगळता वर्षाकाठी केवळ २०० रुपये विद्यार्थिनींच्या हातात पडतात.

कंधार ( नांदेड) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत अन् शाळेतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमातीतील शासनाकडून प्रतिविद्यार्थिनी दिवसाला १ रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो. गत ३२ वर्षांपासून सावित्रीच्या लेकींसाठीच्या या प्रोत्साहनपर भत्त्यात सरकारने एका पैशाचीही वाढ केली नाही. सावित्रीबाई फुले यांच्या नावे सुरू केलेल्या योजनेतील प्रोत्साहन भत्ता वाढविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधींकडून होत नाही. रविवार व इतर सुट्या वगळता वर्षाकाठी केवळ २०० रुपये विद्यार्थिनींच्या हातात पडतात. त्यामुळे या योजेनच्या आढावा घेऊन भत्ता वाढवावा, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. 

१९९२ ला तत्कालीन सरकारने दुर्बल घटकांतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या प्रतिविद्यार्थिनी दिवसाला १ रुपया प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ही योजना सुरू केली. मात्र मागील ३२ वर्षांपासून भत्ता वाढलेला नाही. वाढती महागाई पाहता मिळणारा भत्ता अतिशय तुटपुंजा आहे. मिळणाऱ्या भत्याच्या तुलनेत शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत कित्येक पटीने वाढल्या आहेत. पेनमधील कांडीची किंमतही एक रुपयापेक्षा जास्त आहे. तरीही आजपर्यंत कोणत्याच सरकारने विद्यार्थिनींच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र सावित्रींच्या लेकींना केवळ १ रुपयाच उपस्थिती भत्ता आजतागायत मिळत आहे. या अल्पभत्त्याचा मुलींना लाभ होत नाही. त्यातच आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झाली नसताना हा रुपया देखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. सरकारने थट्टा थांबवावी. त्यामुळे ही योजना एक तर बंद करावी नाही तर त्यामध्ये वाढ करावी, अशी मागण येथील पालक वर्गातून केली जात आहे.

शैक्षणिक वर्षासाठी दर दिवसाला १ रुपया त्यात वर्षभरातील रविवार वगळून २०० ते २२० रूपयापर्यंत उपस्थिती भत्ता दिला जातो. योजनेला ३२ वर्षे उलटली आहेत. मात्र, एकीकडे वेतन आयोग लागू होत असताना दुसरीकडे मात्र, विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात छदामही वाढ करण्यात आलेली नाही. वेतन आयोग लागू व्हावा, पेन्शन योजना सुरू व्हावी, यासाठी आवाज उठविणाऱ्या शिक्षक संघटनांनी व लोकप्रतिनिधींनी गरीब विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ व्हावी, यासाठी आवाज उठविण्याची गरज आहे. अशी मागणी पालकांमधून होत आहे. लाडक्या बहिणींना महिन्याला घरबसल्या १५०० रुपये सुरु झाले आहेत. दारिद्रय रेषेखालील गरिबांच्या मुलींची महिन्याला २२ रुपये देऊन थट्टा केली जात आहे. वाढती महागाई लक्षात घेता यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. जशी लाडकी बहीण आहेत, तशी लाडकी मुलगी होऊ शकत नाही का? असा सवाल पालक वर्गातून केला जात आहे.

शासनाने दुर्लक्ष केलेयासंदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने राज्य शाखेच्या वतीने अनेकदा शासनाला निवेदन देऊन प्रत्येक विद्यार्थीनीना (आर्थिक दुर्बल घटकातील)महागाईच्या दृष्टीने १ रुपया ऐवजी १० रुपये भत्ता करण्यात यावे अशी मागणी केली. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. - जी. एस. मंगनाळे, राज्य कोषाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना

टॅग्स :Nandedनांदेडladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाState Governmentराज्य सरकारEducationशिक्षण