शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

थकबाकीमुळे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:55 IST

जिल्हा परिषदेकडून ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्यासाठी अग्रीम पाणीपट्टी न भरल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून यापुढे पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअग्रीम पाणीपट्टी जिल्हा परिषदेकडे थकले पाटबंधारे विभागाचे ५६ कोटी ५५ लाख

नांदेड : जिल्हा परिषदेकडून ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्यासाठी अग्रीम पाणीपट्टी न भरल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून यापुढे पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा न करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.उर्ध्व पैनगंगा प्रकल्प अर्थात इसापूर धरणातून २०१८-१९ साठी नांदेड जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी ३५ दलघमी पाणी आरक्षित केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दरवर्षी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाकडून बिगरसिंचन पाणी सोडण्यात येते.आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याचे पैसे जिल्हा परिषद कार्यालयाकडून अद्याप भरण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे, जून २०१८ अखेर नांदेड जिल्हा परिषदेकडे ५५ कोटी ८२ लाख रुपये तसेच सन २०१८-१९ साठी आरक्षित पाण्याच्या ५० टक्के अग्रीम पाणीपट्टीपोटी ६३ लाख रुपये असे एकूण ५६ कोटी ५५ लाख रुपये थकित आहेत. यापैकी केवळ १६ लाख रुपये जिल्हा परिषदेने भरले आहेत.शासन निर्णयाप्रमाणे आरक्षित पाण्याची अग्रीम पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरणे आवश्यक असतानाही संबंधित कार्यालयाने थकीत व अग्रीम पाणीपट्टीची रक्कम भरणा न केल्यामुळे यापुढे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र १ नांदेड या कार्यालयाकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता नांदेड यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडत आहे. जिल्ह्यात जवळपास ८० टँकर सुरु आहेत. भर उन्हाळ्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेसह जिल्हा प्रशासनाचीही तारांबळ उडणार आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच गतवर्षी पावसाचे प्रमाणही कमी राहिले होते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.दक्षिण नांदेड शहरातही पाणीबाणीनांदेड शहरातही पाणीबाणी निर्माण झाली आहे. दक्षिण नांदेडला पाणीपुरवठा करताना महापालिकेची कसरत सुरु आहे. त्यातच इसापूर प्रकल्पातून पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी चौथ्या टप्प्यातील पाणी घेण्यात येत असल्याने उत्तर नांदेडचा पाणीप्रश्न काहीअंशी का होईना सुटला आहे. पण दक्षिण नांदेडवर आता पाणीसंकट ओढवले आहे. त्यातच पाणी घेण्यासाठी पर्यायी प्रकल्पही कोरडे झाल्याने आहे त्याच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. मनपाने दोनऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांची गस्तही सुरु केली आहे. प्रकल्प क्षेत्रातील विद्युतपंपाचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे अवैध पाणी उपशावर काही प्रमाणात का होईना नियंत्रण आले आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणwater transportजलवाहतूक