शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

थकबाकीमुळे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:55 IST

जिल्हा परिषदेकडून ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्यासाठी अग्रीम पाणीपट्टी न भरल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून यापुढे पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअग्रीम पाणीपट्टी जिल्हा परिषदेकडे थकले पाटबंधारे विभागाचे ५६ कोटी ५५ लाख

नांदेड : जिल्हा परिषदेकडून ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्यासाठी अग्रीम पाणीपट्टी न भरल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून यापुढे पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा न करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.उर्ध्व पैनगंगा प्रकल्प अर्थात इसापूर धरणातून २०१८-१९ साठी नांदेड जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी ३५ दलघमी पाणी आरक्षित केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दरवर्षी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाकडून बिगरसिंचन पाणी सोडण्यात येते.आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याचे पैसे जिल्हा परिषद कार्यालयाकडून अद्याप भरण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे, जून २०१८ अखेर नांदेड जिल्हा परिषदेकडे ५५ कोटी ८२ लाख रुपये तसेच सन २०१८-१९ साठी आरक्षित पाण्याच्या ५० टक्के अग्रीम पाणीपट्टीपोटी ६३ लाख रुपये असे एकूण ५६ कोटी ५५ लाख रुपये थकित आहेत. यापैकी केवळ १६ लाख रुपये जिल्हा परिषदेने भरले आहेत.शासन निर्णयाप्रमाणे आरक्षित पाण्याची अग्रीम पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरणे आवश्यक असतानाही संबंधित कार्यालयाने थकीत व अग्रीम पाणीपट्टीची रक्कम भरणा न केल्यामुळे यापुढे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र १ नांदेड या कार्यालयाकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता नांदेड यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडत आहे. जिल्ह्यात जवळपास ८० टँकर सुरु आहेत. भर उन्हाळ्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेसह जिल्हा प्रशासनाचीही तारांबळ उडणार आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच गतवर्षी पावसाचे प्रमाणही कमी राहिले होते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.दक्षिण नांदेड शहरातही पाणीबाणीनांदेड शहरातही पाणीबाणी निर्माण झाली आहे. दक्षिण नांदेडला पाणीपुरवठा करताना महापालिकेची कसरत सुरु आहे. त्यातच इसापूर प्रकल्पातून पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी चौथ्या टप्प्यातील पाणी घेण्यात येत असल्याने उत्तर नांदेडचा पाणीप्रश्न काहीअंशी का होईना सुटला आहे. पण दक्षिण नांदेडवर आता पाणीसंकट ओढवले आहे. त्यातच पाणी घेण्यासाठी पर्यायी प्रकल्पही कोरडे झाल्याने आहे त्याच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. मनपाने दोनऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांची गस्तही सुरु केली आहे. प्रकल्प क्षेत्रातील विद्युतपंपाचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे अवैध पाणी उपशावर काही प्रमाणात का होईना नियंत्रण आले आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणwater transportजलवाहतूक