शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
4
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
5
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
6
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
7
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
8
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
9
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
10
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
11
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
12
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
13
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
14
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
15
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
16
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
17
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
18
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
19
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
20
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी

थकबाकीमुळे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:55 IST

जिल्हा परिषदेकडून ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्यासाठी अग्रीम पाणीपट्टी न भरल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून यापुढे पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअग्रीम पाणीपट्टी जिल्हा परिषदेकडे थकले पाटबंधारे विभागाचे ५६ कोटी ५५ लाख

नांदेड : जिल्हा परिषदेकडून ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्यासाठी अग्रीम पाणीपट्टी न भरल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून यापुढे पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा न करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.उर्ध्व पैनगंगा प्रकल्प अर्थात इसापूर धरणातून २०१८-१९ साठी नांदेड जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी ३५ दलघमी पाणी आरक्षित केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दरवर्षी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाकडून बिगरसिंचन पाणी सोडण्यात येते.आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याचे पैसे जिल्हा परिषद कार्यालयाकडून अद्याप भरण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे, जून २०१८ अखेर नांदेड जिल्हा परिषदेकडे ५५ कोटी ८२ लाख रुपये तसेच सन २०१८-१९ साठी आरक्षित पाण्याच्या ५० टक्के अग्रीम पाणीपट्टीपोटी ६३ लाख रुपये असे एकूण ५६ कोटी ५५ लाख रुपये थकित आहेत. यापैकी केवळ १६ लाख रुपये जिल्हा परिषदेने भरले आहेत.शासन निर्णयाप्रमाणे आरक्षित पाण्याची अग्रीम पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरणे आवश्यक असतानाही संबंधित कार्यालयाने थकीत व अग्रीम पाणीपट्टीची रक्कम भरणा न केल्यामुळे यापुढे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र १ नांदेड या कार्यालयाकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता नांदेड यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडत आहे. जिल्ह्यात जवळपास ८० टँकर सुरु आहेत. भर उन्हाळ्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेसह जिल्हा प्रशासनाचीही तारांबळ उडणार आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच गतवर्षी पावसाचे प्रमाणही कमी राहिले होते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.दक्षिण नांदेड शहरातही पाणीबाणीनांदेड शहरातही पाणीबाणी निर्माण झाली आहे. दक्षिण नांदेडला पाणीपुरवठा करताना महापालिकेची कसरत सुरु आहे. त्यातच इसापूर प्रकल्पातून पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी चौथ्या टप्प्यातील पाणी घेण्यात येत असल्याने उत्तर नांदेडचा पाणीप्रश्न काहीअंशी का होईना सुटला आहे. पण दक्षिण नांदेडवर आता पाणीसंकट ओढवले आहे. त्यातच पाणी घेण्यासाठी पर्यायी प्रकल्पही कोरडे झाल्याने आहे त्याच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. मनपाने दोनऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांची गस्तही सुरु केली आहे. प्रकल्प क्षेत्रातील विद्युतपंपाचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे अवैध पाणी उपशावर काही प्रमाणात का होईना नियंत्रण आले आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणwater transportजलवाहतूक